आकाश रात्रभर एका वेगळ्याच विचारात झोपला. त्याला कर्णिक यांचे शब्द सतत आठवत होते. आणि राहून राहून त्याच्या समोर निशाचा चेहरा येत होता. रात्रभर तो विचारात होता. सकाळी लवकर उठून तो कॉलेज मध्ये गेला. त्यानंतर त्याने क्लास अटेंड केले.
कॉलेज सुटल्यावर सदानंद त्याला त्याच्या वागण्याबद्दल बोलू लागला.
