मी उगाच वाट पाहत बसलो, जिथे कोणी येणारच नाही !!
मी उगाच अश्रू ढाळत बसलो, जिथे त्यास किंमतच नाही !!

मी उगाच वाट पाहत बसलो, जिथे कोणी येणारच नाही !!
मी उगाच अश्रू ढाळत बसलो, जिथे त्यास किंमतच नाही !!
मनात माझ्या तुझीच आठवण
तुलाच ती कळली नाही
नजरेत माझ्या तुझीच ओढ
तुलाच ती दिसली नाही
सखे कसा हा बेधुंद वारा
मनास स्पर्श करत नाही
हळुवार पावसाच्या सरी बरसत
तुलाच का भिजवून जात नाही
एक अल्लड नटखट रूप सुंदरी
पाहता क्षणी मनात भरली
शब्दांसवे खूप बोलली
कवितेतूनी भेटू लागली
कधी गंधात त्या दरवळून गेली
कधी फुलांसवे हरवून चालली
कधी त्या स्वप्नी येऊन गेली
कधी अलगद मिठीत विरली
मनातले सांगायचे कदाचित
राहुन गेले असेनही
पण डोळ्यातले भाव माझ्या
तु वाचले नाहीस ना
हात तुझा हातात घेऊन
तुला थांबवायचे होते ही
पण तु जाताना तुझा हात
मी सोडला नाही ना
नाती येतात आयुष्यात
सहज निघुनही जातात
मनातल्या भावना अखेर
मनातच राहतात
कोणी दुखावले जातात
कोणी आनंदाने जातात
नात्याची गाठ अखेर
सहज सोडुन जातात
प्रेमात पडल ना की असच होतं
आकाशातले चंद्र तारे चांदण्याच होतं
धडधडनार ह्रदय ही दिल होतं
तासन तास वाट पहान झुरन होतं
भान जान म्हणजे आठवणीत रमण होतं
प्रेमात पडल ना की असच होतं
सतत तिच्या विचारात राहणं
तिच्या साठी चार ओळी लिहणं
लिहुनही ते तिलाच न कळनं
यालाच प्रेम म्हणतात का?
न राहुनही तिला बघावं
डोळ्यात मग साठवावं
अश्रु मध्ये दिसावं
यालाच प्रेम म्हणतात का?
प्रेम केलं तरी राग येतो
नाही केलं तरी राग येतो
तुच सांग प्रेम आहे की नाही
पाहील तरी राग येतो
नाही पाहिल म्हणून राग येतो
खर सांग चोरुन पाहतेस की नाही