चुकलेले मत
हताश बळ
लाचार जीवन
पुन्हा ती वाट नाही!!
शब्दाची कटुता
तिरस्कार असता
मनातील भावना
प्रेम दिसत नाही!!
चुकलेले मत
हताश बळ
लाचार जीवन
पुन्हा ती वाट नाही!!
शब्दाची कटुता
तिरस्कार असता
मनातील भावना
प्रेम दिसत नाही!!
खुप काही घडाव
नजरेस ते पडाव
मला काय याचे
मौन असेच राहणार!!
सत्य समोर इथे
बोलेल कोण ते
शांत आहेत ओठ
भिती अशीच राहणार!!
खरंच सांग एकदा
आठवणी मिटता येतात
वाळुवरच्या रेषां सारख्या
सहज पुसता येतात
विसरुन जाव म्हटलं
तरी लाटां सारख्या येतात
दुर्लक्ष करावे म्हटलं
तरी मन ओले करतात
आज अचानक मला
आठवणीचे तरंग दिसले
प्रवासातील आपण दोघे
आज मी एकटीच दिसले
दुरावलास तु नकळत
व्यर्थ ते कारण दिसले
कळता मझ चुक ही
किती हे काळ दिसले
सुगंध मातीचा
पुन्हा दरवळु दे
पड रे पावसा
ही माती भिजु दे
शेत सुकली पिक करपली
शेतकरी हताश रे
नकोस करु थट्टा
जीव माझा तुझ्यात रे
ओठांवरच्या शब्दांना
मार्ग हवे मोकळे
तु आहेस जवळ पण,
शब्द व्हावे बोलके
हे प्रेम नी भावना
नकळत जे घडते
अबोल त्या बंधनात
शब्द व्हावे बोलके
एक होता राजा
माझा जाणता राजा
शिवाजी तेचे ऐसे नाव
स्वराज्याचा ध्यास तो
आमचा इतिहास तो
क्षण क्षण ही आज बोलती
जय जिजाऊ जय शिवराय।।