मी उगाच वाट पाहत बसलो, जिथे कोणी येणारच नाही !!
मी उगाच अश्रू ढाळत बसलो, जिथे त्यास किंमतच नाही !!
नकळत मग मी हरवून गेलो , जिथे कोणी शोधणारच नाही !!
नकळत मग मी स्वतःस भेटलो, जिथे कोणास ओळखतच नाही !!
मी उगाच वाट पाहत बसलो, जिथे कोणी येणारच नाही !!
मी उगाच अश्रू ढाळत बसलो, जिथे त्यास किंमतच नाही !!
नकळत मग मी हरवून गेलो , जिथे कोणी शोधणारच नाही !!
नकळत मग मी स्वतःस भेटलो, जिथे कोणास ओळखतच नाही !!
चाल पुढं नको डगमगू, बोलते ती ज्योती !!
स्वतःस का जाळून घेते, कोणती ही वृत्ती !!
असावी पुन्हा नव्याने एक, चालण्याची गती!!
उन्ह वारा पाऊस नी काय, नसावी कोणती भीती !!
आठवांच्या पानावरती, भरली एक शाळा
शाळेमध्ये कोण आले , चला एकदा पाहा!!
अभ्यास करूया , मस्ती करूया !!
मित्रांच्या दुनियेत, जाऊन तरी पाहा !!
इतिहास ,भूगोल, नागरिकशास्त्र
पुस्तक एकदा, वाचून तरी पाहा !!
संसाराच्या या कवितेत कधी मी बोलेल तर कधी ती
प्रश्न माझे असतील आणि उत्तरे देईल ती
सांभाळून घ्या हा मला आता सांगते आहे मी
चुकलंच काही सांगताना त्याचीं माफी मागते मी
तासनतास कोऱ्या कागदावर
तुझ्याचसाठी मी लिहावे
कधी नकळत ते शब्दही तेव्हा
तुझ्याच प्रेमात पडावे
मी विसरून शोधतो तुला
स्वप्नांच्या या जगात रहावे
एकदा वेलीवरची कळी
उगाच रुसुन बसली
काही केल्या कळेना
फुगून का ती बसली
बोलत नव्हती कोणाला
पाना मागे लपुन बसली
हसत नव्हती कशाला
अबोल होऊन बसली
तुझ्या मनातील मी
तुझ्या ह्रदयात पाहताना
अबोल राहुन शब्दातुनी
अश्रुतही राहताना
सांग सखे प्रेम तुझे
एकांतात गातांना
बोल सखे भाव तुझे
माझ्या डोळ्यात पाहतांना
प्रेम मला कधी कळलचं नाही
बागेतल्या फुलांकडे कधी वळलच नाही
मनातल्या कोपर्यात कधी कोण दिसलच नाही
म्हणुनच प्रेम मला कधी कळलचं नाही. .
तिचं हसणं कधी पाहिलंच नाही
त्याच रहस्य कधी जाणलंच नाही
म्हणुनच प्रेम मला कधी कळलचं नाही