बहरून गेला सांज तो वारा, चाहूल तुझ्या येण्याची !!
हुरहूर त्या ओल्या वाटेवरी का ? उगा तुला शोधण्याची !!
सांगतो अबोल शब्दास त्या काही, कविता तुझ्या प्रेमाची !!
प्रत्येक पान बोलेन मग तेव्हा, गोष्ट त्या आठवांची !!
बहरून गेला सांज तो वारा, चाहूल तुझ्या येण्याची !!
हुरहूर त्या ओल्या वाटेवरी का ? उगा तुला शोधण्याची !!
सांगतो अबोल शब्दास त्या काही, कविता तुझ्या प्रेमाची !!
प्रत्येक पान बोलेन मग तेव्हा, गोष्ट त्या आठवांची !!
सांग सखे कोणते मी, नाते जपत होतो !!
श्वास तो असा की? हळूवार बोलून जातो !!
हाक ती मनापासून येता, आवाज बंद होतो !!
प्रेम मी व्यक्त करता, तुझ्यात मिसळून जातो !!
मी उगाच वाट पाहत बसलो, जिथे कोणी येणारच नाही !!
मी उगाच अश्रू ढाळत बसलो, जिथे त्यास किंमतच नाही !!
नकळत मग मी हरवून गेलो , जिथे कोणी शोधणारच नाही !!
नकळत मग मी स्वतःस भेटलो, जिथे कोणास ओळखतच नाही !!
बरसतात कित्येक सरी, चिंब मी भिजते !!
भिजल्या त्या मिठीत माझ्या, उगा तुला शोधते !!
सांग कसे समजावू मना, ना कोणा ऐकते !!
कोऱ्या कागदावर सहज ते , चित्र तुझे रेखाटते !!
काही क्षण बोलतात
काही क्षण अबोल असतात
काही क्षण चांगले
तर काही क्षण वाईट असतात
आपले कोण असतात
परके कोण असतात
क्षण जसे बदलतात
नाते तसे बोलु लागतात
मी पाहिलय तुला
माझ्या डोळ्या मध्ये
समोर तु नसताना
माझ्या आसवांना मध्ये
झुरताना मनातुन
माझ्या कविते मध्ये
शब्दाविना गुणगुणत
माझ्या गाण्या मध्ये
बघ एकदा माझ्याकडे
तो मीच आहे
तुझ्या पासुन दुर तो
आज ही तुझाच आहे
तु विसरली अशील ते
मी तिथेच जगत आहे
भुतकाळाचा अर्थ काय
माझं सगळं तिथेच आहे
प्रेमात पडल ना की असच होतं
आकाशातले चंद्र तारे चांदण्याच होतं
धडधडनार ह्रदय ही दिल होतं
तासन तास वाट पहान झुरन होतं
भान जान म्हणजे आठवणीत रमण होतं
प्रेमात पडल ना की असच होतं