बहरून गेल्या फुलात, गंध दरवळून ते जावे !!
तुझ्या माझ्या नात्यात, जणू पहाट घेऊन यावे !!
कधी सावरावे तू, कधी सावरून मी घ्यावे !!
कधी बोलावे तू, कधी अबोल मी ऐकावे !!
बहरून गेल्या फुलात, गंध दरवळून ते जावे !!
तुझ्या माझ्या नात्यात, जणू पहाट घेऊन यावे !!
कधी सावरावे तू, कधी सावरून मी घ्यावे !!
कधी बोलावे तू, कधी अबोल मी ऐकावे !!
आई तुळशी समोरचा दिवा असते
बाबा त्याचा मंद प्रकाश असतात
आई अंगणातील रांगोळी असते
बाबा त्या रांगोळीतला रंग असतात
काही क्षण बोलतात
काही क्षण अबोल असतात
काही क्षण चांगले
तर काही क्षण वाईट असतात
आपले कोण असतात
परके कोण असतात
क्षण जसे बदलतात
नाते तसे बोलु लागतात
तु हवी आहेस मला
अबोल राहुन बोलणारी
माझ्या मनात राहुन
मला एकांतात साथ देणारी
माझ्या शब्दांन मध्ये राहताना
कवितेत जगणारी
आणि डोळ्यातुन पाणी येताच
अलगद ते पुसणारी!!
आस लागे जीवा
साथ दे तु मला
वाट ती हरवली
शोधीसी रे तुला
राख झाली मना
जाळते जाणीवा
मन हे तरीही
शोधीसी रे तुला
तुझ्या मनातील मी
तुझ्या ह्रदयात पाहताना
अबोल राहुन शब्दातुनी
अश्रुतही राहताना
सांग सखे प्रेम तुझे
एकांतात गातांना
बोल सखे भाव तुझे
माझ्या डोळ्यात पाहतांना
नाती येतात आयुष्यात
सहज निघुनही जातात
मनातल्या भावना अखेर
मनातच राहतात
कोणी दुखावले जातात
कोणी आनंदाने जातात
नात्याची गाठ अखेर
सहज सोडुन जातात
हरवलेल्या पत्रास आता
कोणी पत्ता सांगेन का
खुप काही लिहलंय मनातल
आता कोणी वाचेन का
काळाच्या धुळीत मिसळुन
सगळं काही संपलय का
शोधुनही सापडेना काही
वाट मी चुकतोय का