क्षण || KSHAN MARATHI POEM ||
काही क्षण बोलतात
काही क्षण अबोल असतात
काही क्षण चांगले
तर काही क्षण वाईट असतात
आपले कोण असतात
परके कोण असतात
क्षण जसे बदलतात
नाते तसे बोलु लागतात
काही क्षण बोलतात
काही क्षण अबोल असतात
काही क्षण चांगले
तर काही क्षण वाईट असतात
आपले कोण असतात
परके कोण असतात
क्षण जसे बदलतात
नाते तसे बोलु लागतात
तु हवी आहेस मला
अबोल राहुन बोलणारी
माझ्या मनात राहुन
मला एकांतात साथ देणारी
माझ्या शब्दांन मध्ये राहताना
कवितेत जगणारी
आणि डोळ्यातुन पाणी येताच
अलगद ते पुसणारी!!
आस लागे जीवा
साथ दे तु मला
वाट ती हरवली
शोधीसी रे तुला
राख झाली मना
जाळते जाणीवा
मन हे तरीही
शोधीसी रे तुला
तुझ्या मनातील मी
तुझ्या ह्रदयात पाहताना
अबोल राहुन शब्दातुनी
अश्रुतही राहताना
सांग सखे प्रेम तुझे
एकांतात गातांना
बोल सखे भाव तुझे
माझ्या डोळ्यात पाहतांना
नाती येतात आयुष्यात
सहज निघुनही जातात
मनातल्या भावना अखेर
मनातच राहतात
कोणी दुखावले जातात
कोणी आनंदाने जातात
नात्याची गाठ अखेर
सहज सोडुन जातात
हरवलेल्या पत्रास आता
कोणी पत्ता सांगेन का
खुप काही लिहलंय मनातल
आता कोणी वाचेन का
काळाच्या धुळीत मिसळुन
सगळं काही संपलय का
शोधुनही सापडेना काही
वाट मी चुकतोय का
वाटा शोधत होत्या मला
मी मात्र स्वतःतच गुंतलो होतो
बेबंद वार्या सोबत
उगाच फिरत बसलो होतो
वळणावर येऊन सखी ती
सोबत येण्यास तयार होती
मी मात्र परक्याच्या घरात
उगाच भांडत बसलो होतो