आजचे ते क्षण, उद्याची आठवण व्हावी !! सहज जगल्या क्षणांचे, जणू मोती बनवावी
असेच सोडून जाऊ नकोस || Virah Kavita || Love Poems ||
वाईट कदाचित ही वेळ असेल !! उगाच सोबत घेऊ नकोस !! सुखी क्षणांच्या आठवांना तू !! असेच सोडून जाऊ नकोस !! बरंच काही आहे मनात !! मनात त्या साठवू नकोस !! भरल्या डोळ्यांनी आज तू !! असेच सोडून जाऊ नकोस !! मी दोन पावले पुढे येईल !! तूही तिथे थांबू नकोस !! जड त्या पावलांन सवे तू !! असेच सोडून जाऊ नकोस !!
तुझे लाजणे !! ||BEst Marathi Poems || Kavita Sangrah || COUPLE IMAGES ||
किती आठवांचा उगा अट्टाहास नव्याने तुला ते जणू पाहताच!! सोबतीस यावी ही एकच मागणी तुझ्यासवे त्या जणू बोलतात !! चांदणी ती पाहता तुला शोधणे रात्रीस त्या जणू हरवणे !! चांदणे होऊन तू पसरून जावे त्या चंद्रास त्या जणू सांगतात !!
सुर्यास्त || SURYAST || MARATHI POEM ||
अस्तास चालला सूर्य जणु परका मज का भासे रोज भेटतो मज यावेळी तरी अनोळखी मज का वाटे ती किरणांची लांब रेष मज एकटीच आज का भासे झाडा खालचे मंद दिवे मज आपुलकीचे आज का वाटे
जगुन बघ थोडेसे || PREM KAVITA MARATHI||
काही क्षण माझे काही क्षण तुझे हरवले ते पाहे मिळवले ते माझे मी एक शुन्य तु एक शुन्य तरी का हिशेबी मिळे एक शुन्य
मागणं || PREM KAVITA ||
बरंचस आता या मनातच राहिल तु निघुन गेलीस मन तिथेच राहिल तुझा विरह असेल माझ दुखः ही ते फक्त आता डोळ्यातच राहिलं