क्षणभर सखे या आठवांचा, भार नकोसा होतो!!
तुझ्यासवे त्या भेटीचा जणू, गंध हरवून जातो !!
शोधणे ते उगाच वाटे , दिशाहीन मी होतो !!
सांगणे त्या मनास वाटे, उगाच जीव जातो !!

क्षणभर सखे या आठवांचा, भार नकोसा होतो!!
तुझ्यासवे त्या भेटीचा जणू, गंध हरवून जातो !!
शोधणे ते उगाच वाटे , दिशाहीन मी होतो !!
सांगणे त्या मनास वाटे, उगाच जीव जातो !!
अल्लड ते तुझे हसू मला
नव्याने पुन्हा भेटले
कधी खूप बोलले माझ्यासवे
कधी अबोल राहीले
बावरले ते क्षणभर जरा नी
ओठांवरती जणू विरले
अल्लड ते हसू मला का
पुन्हा तुझ्यात हरवून बसले
“नव्याने पुन्हा ती वाट दिसली
जिथे आजही तुझी ओढ आहे
नको म्हटले तरी क्षणभर ते थांबले
नजरेत आजही तुझाच चेहरा आहे
अलगद मग ती कळी खुलावी
नात्यास मग या गंध द्यावी
कधी उगाच हसून जावी
कधी माझ्यासवे गीत गावी
“मला कधी या प्रियाच काही कळलंच नाही !! इतक्यात ती मला माफी मागून गेली आणि लगेच अनोळखी असल्या सारखे मला काहीच न बोलता निघून गेली !! खरंच मी कधी ओळखु शकत नाही तिला !! पण नक्की ती काय शोधतेय ते सांगेन तर ना !! ” सुहास कित्येक विचार मनातच बोलत होता.
आठवणींच्या जगात आज मी
सहजच हरवून गेलो आहे
पण भारतमाते तुला रक्षण्या
मी निडर होऊन इथे उभा आहे
आठवण त्या मातेची येते
जिच्या उदरात मी जन्म घेतला आहे
पण त्या मातेस तुला रक्षण्याचे
वचन मी देऊन आलो आहे
घरभर छोट्या पावलांनी
अगदी मनसोक्त फिरावं
माझ्या म्हाताऱ्याच्या काठीच
दुसरं टोक त्यांनी धरावं
कधी द्यावा आधार म्हातारपणात
तर कधी कुशीत यावं
या म्हाताऱ्याला फक्त आता
आपलसं करून घ्यावं
मनात माझ्या तुझीच आठवण
तुलाच ती कळली नाही
नजरेत माझ्या तुझीच ओढ
तुलाच ती दिसली नाही
सखे कसा हा बेधुंद वारा
मनास स्पर्श करत नाही
हळुवार पावसाच्या सरी बरसत
तुलाच का भिजवून जात नाही