शुभ्र वस्त्र नेसूनी, चांदण्यात मग हरवूनी !!
रात्रीस त्या बोलता, हळुच तो हसला !!

शुभ्र वस्त्र नेसूनी, चांदण्यात मग हरवूनी !!
रात्रीस त्या बोलता, हळुच तो हसला !!
“अयोध्या पती तो त्रिलोकरक्षक: !! मर्यादा पुरुषोत्तम जानकीवल्लभ: !!
त्याग मूर्ती असा तो पितृभक्त: !! नाव मुखी सदा तो रामचंद्र: !!
कौसल्ये: पुत्र असा जो परब्रह्म: !! आदी अंती असा जो शाश्वत: !!
सत्यवाक् असा जो सत्यविक्रम: !! नाव मुखी सदा तो रामचंद्र: !!
नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !!
क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !!
कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !!
हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !!
मंद मंद प्रकाश चहूकडे !! असाच पसरत जावा!!
एक दिवा तो वाती सवे !! अखंड तेवत रहावा !!
कधी देव्हाऱ्यात असताना !! स्वतःस विसरून जावा !!
कधी तुळशी समोर बसताना!! अंगणात त्या शोभावा !!
निरांजन घेता सांभाळून सारे !! तेलासवे जळावा !!
रात्र असावी सोबतीस मग !! अजून खुलून दिसावा !!
गरिबाच्या बुडावर काठ्या !! श्रीमंताच्या पायी सत्ता आली !!
गरीब भुकेने मेला !! श्रीमंतांची मजा मस्ती करून झाली !!
तुझ्या अन्नछत्राच्या खाली , कित्येक गरीब जेवून गेली !!
आणि तुझ्याच दारात म्हणे, रोगराई हसहसत खेळून गेली !!
शोधावी ती माणसं
जी स्वप्नांशी झुंजत असतात
झोपलेल्या उगाच पाहत
वेळ वाया घालवू नये
आज तिला भेटल्या नंतर खरंच काय बोलावं तेच कळलं नाही मला !! मंदारला भेटणं माझ्यासाठी खूप अवघड होतं !! पण जेव्हा भेटलो तेव्हा मनातला द्वेष, राग नाहीसा झाला. खरंच कोणी इतकं प्रेम कसं करत असेल कोणावर ??
ती झुळूक उगा सांजवेळी
मला हरवून जाते
मावळतीच्या सुर्यासवे
एक गीत गाते
त्या परतीच्या पाखरांची
जणू ओढ पहाते
ती झुळूक उगा सांजवेळी
गंध पसरवून जाते