अश्रुसवे उगाच बोलता
शब्दही का भिजून गेले
आठवणीतल्या तुला पाहता
हळूच मग ते विरून गेले

अश्रुसवे उगाच बोलता
शब्दही का भिजून गेले
आठवणीतल्या तुला पाहता
हळूच मग ते विरून गेले
विसरून जाशील मला तू
की विसरून जावू तुला मी
भाव या मनीचे बोलताना
खरंच न कळले शब्द ही
वाट ती रुसली माझ्यावरी
की वाट ती अबोल तुलाही
वळणावरती ते पारिजातक
सुकून गेले ते फुलंही
कधी कधी भास तुझे ते
उगाच तुला शोधतात सखे
पण ते मनातल्या मृगजळा सवे
मला स्वप्नात घेऊन जातात
हवंय काय या मनाला तरी
विचारलं मी कित्येक वेळेस
आणि हे मन मला तेव्हा
तुझ्याच प्रेमात घेऊन जातात
आठवणींच्या जगात आज मी
सहजच हरवून गेलो आहे
पण भारतमाते तुला रक्षण्या
मी निडर होऊन इथे उभा आहे
आठवण त्या मातेची येते
जिच्या उदरात मी जन्म घेतला आहे
पण त्या मातेस तुला रक्षण्याचे
वचन मी देऊन आलो आहे
“तो पाऊस आणि ती खिडकी
मला खूप काही बोलतात
आठवणींच्या कित्येक थेंबात
मला चिंब भिजवून जातात
कधी अगदी मनसोक्त बरसून
माझ्या सवे ते गातात
कधी अगदी सरी त्या निवांत
माझ्यात हरवून जातात
माझ्या मनाच्या तिथे एक
तुझी आठवण सखे गोड आहे
कधी अल्लड एक हसू तुझे
कधी उगाच रागावणे आहे
काहीतरी राहून जावं
अस मन का असतं
झाडावरची पाने गळताना
उगाच का ते पहात असतं
हे मिळावं ते रहावं
स्वतःस का सांगत असतं
काही तरी गमावल्यावर
लपुन का ते रडतं असतं
कुठे असेल अंत
मनातील विचारांचा
एक घर एक मी
आणि या एकांताचा
भिंती बोलतील मला
संवाद हा कशाचा
आरशातील एक चित्र
शोध हा स्वतःचा