“बोलावंसं वाटलं तरी ,
काय बोलावं , कधीच कळलं नाही!!
समुद्राच्या लाटेने ते मन,
नकळत ओल केलं तरी,
मनास ते कधीच कळल नाही!!
सारा भार त्या अश्रूनवर होता ,

“बोलावंसं वाटलं तरी ,
काय बोलावं , कधीच कळलं नाही!!
समुद्राच्या लाटेने ते मन,
नकळत ओल केलं तरी,
मनास ते कधीच कळल नाही!!
सारा भार त्या अश्रूनवर होता ,
अलगद स्पर्श करून जाणारी
समुद्राची ती एक लाट
प्रत्येक वेळी नव्याने भेटणारी
पाहात होती माझीच वाट
नकोच आता भार आठवांचा
नकोच ती अधुरी नाती
नकोच ती सावली आपुल्यांची
नकोच त्या अधुऱ्या भेटी
बरेच उरले हातात त्या
रिक्त राहिली तरीही नाती
डोळ्यातल्या आसवांना विचारे
वेदनेची गोष्ट ती कोणती
“मनातले सखे कितीदा सांगुनी
प्रेम तुझ माझे कळलेच का नाही
हळव्या क्षणांची ती साथ तुझ भेटून
त्या डोळ्यात तू शोधलेच का नाही
असं नाही की तुझी आठवण येत नाही
पण आता तुझ्या आठवणीत मी रमतही नाही
समजावतो या मनास आता पण ते ऐकत नाही
क्षणभर तरी ते तुला भेटल्या शिवाय राहत नाही
उगाच भांडत बसत ते माझ्याशी
आणि तुला बोलल्या शिवाय राहत नाही
सांग मी काय करू आता माझच मन माझे ऐकत नाही
अश्रुसवे उगाच बोलता
शब्दही का भिजून गेले
आठवणीतल्या तुला पाहता
हळूच मग ते विरून गेले
“तू शांत हो!! काहीच बोलू नकोस !! तुला बरं व्हायचं आहे !!” प्रिती उठून बाहेर जाऊ लागली.
तेवढ्यात तिचा हात धरत विशाल तिला नकारार्थी मान हलवून लागला. कदाचित त्याला म्हणायचं होत “अखेरच्या या क्षणात माझ्या समोरून तू कुठेही जाऊ नकोस प्रिती!!”
प्रिती पुन्हा बसली. त्याला बोलू लागली.
वाऱ्यास पुसूनी ती वाट पुढची
त्या सावलीतला मी एक पांथस्थ
हवी थोडी विश्रांती नी घोटभर पाणी
पुढच्या प्रवासास मी आहे सज्ज