स्पर्श तुझ्या आठवांचा, ओठांवर त्या क्षणांचा !!
अलगद माझ्या हृदयास, बहरून जातो !!
तू असावे जवळी, मागणे हेच
स्पर्श तुझ्या आठवांचा, ओठांवर त्या क्षणांचा !!
अलगद माझ्या हृदयास, बहरून जातो !!
तू असावे जवळी, मागणे हेच
उन्हाळ्याचे दिवस आणि त्यातून दुपारची वेळ, एक निवांत मिळालेला क्षण आणि पुढे काय करावं हा प्रश्न. मग लॅपटॉप ऑन करून त्यावर एखादा चित्रपट पहायचं ठरलं. मनाशी तस ठरवलं सुद्धा. पण मन कुठेतरी वेगळीकडेच हरवून गेले होत. सगळं काही ट्राय करून बसलो, मित्रांशी फोनवर बोललो, चॅटिंग केली.
बहरून गेला सांज तो वारा, चाहूल तुझ्या येण्याची !!
हुरहूर त्या ओल्या वाटेवरी का ? उगा तुला शोधण्याची !!
सांगतो अबोल शब्दास त्या काही, कविता तुझ्या प्रेमाची !!
प्रत्येक पान बोलेन मग तेव्हा, गोष्ट त्या आठवांची !!
“पाहता पाहता आयुष्याची पाने पटापट पलटत गेली, कळलही नाही आयुष्यात कोण राहील आणि कोण नाही. पण आज जे आहेत बरोबर त्यांच्या सोबत आयुष्याचा पुढचा प्रवास करावा एवढंच वाटतं राहत. पण मग मनातल सांगावं तरी कसे हेच मला कळत नाही
आकाश रात्रभर एका वेगळ्याच विचारात झोपला. त्याला कर्णिक यांचे शब्द सतत आठवत होते. आणि राहून राहून त्याच्या समोर निशाचा चेहरा येत होता. रात्रभर तो विचारात होता. सकाळी लवकर उठून तो कॉलेज मध्ये गेला. त्यानंतर त्याने क्लास अटेंड केले.
कॉलेज सुटल्यावर सदानंद त्याला त्याच्या वागण्याबद्दल बोलू लागला.
सकाळ होताच आकाश आपल्या कामाला लागतो. पण तरीही त्याच मन नकळत दिनेश कर्णिक यांच्या विचारांवर फिरत होत. आपण कुठेतरी चुकत आहोत याची जाणीव त्याला होत होती. थोड्यावेळाने त्यानं त्यांना भेटायचं ठरवलं. आवरून तो त्यांनी दिलेल्या पत्त्यावर गेला. एक भलामोठा वाडा होता तो. त्यामध्ये चहूबाजूंनी झाडे होती. आकाशला आतमध्ये जाताच पिंपळाच्या पानाचा वाऱ्याने होत असलेला आवाज ऐकू येत होता. मध्येच एखादी चिमणी चिवचिव करत होती
पाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण
सायली सोबत संबंध तोडल्या नंतर आकाश आता शांत झाला होता. कोणाशी जास्त बोलायचं नाही, कोणा मित्रात जास्त मिसळायचं नाही. जणू त्यानं स्वतःला स्वतःतच बंधिस्त करून घेतलं होतं. आत्ममग्न झालेला होता, जणू सुखही आपल्यात पाहत होता आणि दुःखही. या सगळ्या काळात त्याची एक सवय मात्र नेहमी त्याच्या सोबत होती. हस्तमैथून करण्याची. जणू आता त्याला त्यातच सुख सापडलं होत. मिळालेल्या मार्क्सना स्वीकारून त्याला पुढचा मार्ग पाहायचा होता.