बहरून गेला सांज तो वारा, चाहूल तुझ्या येण्याची !! हुरहूर त्या ओल्या वाटेवरी का ? उगा तुला शोधण्याची !! सांगतो अबोल शब्दास त्या काही, कविता तुझ्या प्रेमाची !! प्रत्येक पान बोलेन मग तेव्हा, गोष्ट त्या आठवांची !!
वर्तुळ || कथा भाग १७ || पुढचा प्रवास || शेवट भाग ||
"पाहता पाहता आयुष्याची पाने पटापट पलटत गेली, कळलही नाही आयुष्यात कोण राहील आणि कोण नाही. पण आज जे आहेत बरोबर त्यांच्या सोबत आयुष्याचा पुढचा प्रवास करावा एवढंच वाटतं राहत. पण मग मनातल सांगावं तरी कसे हेच मला कळत नाही
वर्तुळ || कथा भाग १६ || खरं प्रेम ||
आकाश रात्रभर एका वेगळ्याच विचारात झोपला. त्याला कर्णिक यांचे शब्द सतत आठवत होते. आणि राहून राहून त्याच्या समोर निशाचा चेहरा येत होता. रात्रभर तो विचारात होता. सकाळी लवकर उठून तो कॉलेज मध्ये गेला. त्यानंतर त्याने क्लास अटेंड केले. कॉलेज सुटल्यावर सदानंद त्याला त्याच्या वागण्याबद्दल बोलू लागला.
वर्तुळ || कथा भाग १५ || संगत ||
सकाळ होताच आकाश आपल्या कामाला लागतो. पण तरीही त्याच मन नकळत दिनेश कर्णिक यांच्या विचारांवर फिरत होत. आपण कुठेतरी चुकत आहोत याची जाणीव त्याला होत होती. थोड्यावेळाने त्यानं त्यांना भेटायचं ठरवलं. आवरून तो त्यांनी दिलेल्या पत्त्यावर गेला. एक भलामोठा वाडा होता तो. त्यामध्ये चहूबाजूंनी झाडे होती. आकाशला आतमध्ये जाताच पिंपळाच्या पानाचा वाऱ्याने होत असलेला आवाज ऐकू येत होता. मध्येच एखादी चिमणी चिवचिव करत होती
वर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||
पाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण
वर्तुळ || कथा भाग १३ || पुढचा मार्ग ||
सायली सोबत संबंध तोडल्या नंतर आकाश आता शांत झाला होता. कोणाशी जास्त बोलायचं नाही, कोणा मित्रात जास्त मिसळायचं नाही. जणू त्यानं स्वतःला स्वतःतच बंधिस्त करून घेतलं होतं. आत्ममग्न झालेला होता, जणू सुखही आपल्यात पाहत होता आणि दुःखही. या सगळ्या काळात त्याची एक सवय मात्र नेहमी त्याच्या सोबत होती. हस्तमैथून करण्याची. जणू आता त्याला त्यातच सुख सापडलं होत. मिळालेल्या मार्क्सना स्वीकारून त्याला पुढचा मार्ग पाहायचा होता.
वर्तुळ || कथा भाग १२ || वास्तवाशी सामना ||
"मला वाटलं होत आपण खूप चांगले मित्र आहोत !! म्हणूनच तर मी तुला माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सांगत होते !! एक चांगला मित्र म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवत होते!! पण आजच तुझं बोलणं मला नाही आवडलं !!" सायलीचा मेसेज पाहताच आकाशला तिच्या या बोलण्याचा भयंकर राग आला, आधीच उद्याच्या रिझल्टच टेन्शन आणि त्यातून सायलीने त्याला दिलेले दुःख यातून तो सावरू शकत नव्हता,
वर्तुळ || कथा भाग ११ || नवे वळण ||
दिवसा मागून दिवस निघून जात होते, रिझल्टची वेळ जवळ आली होती. पण आकाशला वेगळीच ओढ लागली होती, "सायली सोबत गप्पा मारताना, तिच्या सोबत बाहेर कुठे असताना मला जणू एक पूर्णत्व येत. कोणतंही टेन्शन असू दे तिचा एक मेसेज तेवढ्यात आला तर सगळं टेन्शन कुठच्या कुठे निघून जात. पण हे तिलाही वाटतं असेलच ना?? तिलाही माझ्याबद्दल त्याच फीलिंग्ज असतील ना ?? उगाच नाही आम्ही दोघे एकमेकांत इतके गुंतून गेलो