साऱ्या साऱ्या रित्या केल्या
कालच्या आठवणीं
सांग सांग काय सांगू
तुझ्या विन न उरे काही

साऱ्या साऱ्या रित्या केल्या
कालच्या आठवणीं
सांग सांग काय सांगू
तुझ्या विन न उरे काही
“पाठीवरती हात फिरवता
खंजीर त्याने मारला होता
तोच आपुलकीचा सोबती
ज्याने घाव मनावर दिला होता
अश्रू पुसण्यासाठी हात येताच
कित्येक वेळ आपुला वाटला होता
त्याच अश्रूंचे कित्येक उपहास तो
चारचौघात करत बसला होता
“तो पाऊस आणि ती खिडकी
मला खूप काही बोलतात
आठवणींच्या कित्येक थेंबात
मला चिंब भिजवून जातात
कधी अगदी मनसोक्त बरसून
माझ्या सवे ते गातात
कधी अगदी सरी त्या निवांत
माझ्यात हरवून जातात
मनात माझ्या तुझीच आठवण
तुलाच ती कळली नाही
नजरेत माझ्या तुझीच ओढ
तुलाच ती दिसली नाही
सखे कसा हा बेधुंद वारा
मनास स्पर्श करत नाही
हळुवार पावसाच्या सरी बरसत
तुलाच का भिजवून जात नाही
Marathi Stories Poems And Much More !!
तू मला दिसत नाहीस, आणि तुलाही मी नाही
तुझ्या डोळ्यातले अश्रू मला दिसत नाहीत
आणि माझ्या चेहऱ्यावरचे भावही, तुला दिसत नाहीत
आवाज ही तुझा मला ऐकू येत नाही
तुमच्या बद्दल लिहिताना
कित्येक विचार येतात बाबा
आणि प्रत्येक शब्द मला
कित्येक भाव सांगतात
एक गोड मावळती रेंगाळूनी
तिच्या नजरेच्या कडात हरवूनी
उरल्या कित्येक आठवणींत
ती बोलकी एक भेट