“साथ न कोणी
एकटाच मी
विचारांचा शोध
मनाचा तो अंत
प्रवास एकांती
वाट कोणाची
बाकी दिसे का
मनाचा तो अंत
“साथ न कोणी
एकटाच मी
विचारांचा शोध
मनाचा तो अंत
प्रवास एकांती
वाट कोणाची
बाकी दिसे का
मनाचा तो अंत
धुंध त्या सांजवेळी
मन सैरभैर फिरत
आठवणींना वाट मिळे
डोळ्यात दिसत
तु आहेस ही जाणीव
तु नाहीस हा भास
मनही हल्ली गंमत करत
“शब्द हे विचार मांडतात
शब्द हे नाते जपतात
शब्द जपुन वापरले
तर कविता बनतात
शब्द अविचारी वापरले
तर टिका बनतात
तु भरवलेल्या घासाची
तुझ्या प्रेमळ शब्दाची
तु गोंजारलेल्या हातांची,
आई, खरचं आठवण येते.
तु कधी रुसत होती
तु कधी रागवत होतीस
तुझ्या त्या प्रेमाची
आई, खरचं आठवण येते.
जीवनातल्या या क्षणी
आज वाटते मनी
हरवले गंध हे
हरवी ती सांजही
क्षण न मला जपले
ना जपली ती नाती
दुर त्या माळावरी
होत आहे मावळती