सकाळच्या वेळी सखा सगळं आवरून महादेवाच्या मंदिराजवळ येऊन थांबला. आप्पा यायच्या आधीच तो तिथे होता. त्याला पाहून आप्पा जवळ येत म्हणाले.
"व्हा सखा ! बरं झालं लवकर आलास !! आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये !! " आप्पा सोबत तीन चार माणसे अजून होती त्यांच्याकडे पाहत आप्पा म्हणाले ,
"तयार आहात ना रे सगळे !! "
सगळे एका सुरात म्हणाले.
"हो !!"
सखा फक्त पाहत राहिला.