Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » मराठी लेख

हो मला पुन्हा लिहायचं आहे || MARATHI BLOGGER ||

Category मराठी लेख
हो मला पुन्हा लिहायचं आहे  || MARATHI BLOGGER ||
Share This:

खुप दिवस असेच निघून गेले पण मी काही लिहिलंच नाही. शब्दांच्या दुनियेत मी आलोच नाही. शब्दांच मला बोलणं चालूच होत, पण मी त्यांना कागदावर लिहिलंच नाही. क्षणभर राहिले मनात आणि निघून गेले !! काही शब्द रुसून गेले. आपल्या हृदयाच्या आणि विचारांच्या मध्ये उगाच कुठे हरवून गेले. ते शब्द असेच मनात राहून गेले. पण मग कुठेतरी एकटेपणाची जाणीव मला होऊ लागली, या शब्दांची सोबत किती गरजेची आहे ही गोष्ट मला त्यावेळी कळाली. त्या अलगद मनातून कागदावर येणाऱ्या कविता कुठेतरी मला पुन्हा पुन्हा बोलू लागल्या आणि पुन्हा लिहावं असं वाटू लागलं. पण ते सगळं भावनिक होत, सगळं काही त्या शब्दांशी असलेल्या प्रेमासाठी होत, असच कुठेतरी वाटू लागलं. मग त्यात अजून काहीतरी राहतेय ही भावना मला का येत असावी हेच मला कळत नव्हतं. पण शब्दांशी जास्त वेळ लांब नाही राहू शकणार हे ही कळून चुकलं होत. पण मग ती कोणती सल होती मनात, की मला माझ्या शब्दापासून दूर करत होती. तेव्हा मी खूप शोधलं आणि कुठेतरी अनोळखी चेहरे माझ्या डोळ्यासमोरून गेले. कदाचित आजचे अनोळखी पण पूर्वीचे ओळखीचे !! मनाच मनाशी भांडण सुरू झालं. त्या शब्दाचा काय दोष ज्यांनी तुला कायमच साथ दिली. जे आजही तुझ्या एका हाकेवर आत्ता तुझ्यासाठी धावून आले. कशासाठी ?? तुझ्या मनातलं सार काही व्यक्त करण्यासाठी ?? हो ना ?? मग का राहावं त्या शब्दांपासून दूर?? कोणा अनोळखी लोकांमुळे ?? शब्द आजही सोबत आहेत , फक्त त्यातली ती व्यक्ती हरवून गेली, खरंच !! कुठे हरवून गेली आणि कुठे बदलून गेली. पण मग शब्दांनीच प्रतिप्रश्न केला, आमची ओळख ती फक्त अनोळखी चेहऱ्यातच आहे ?? तू म्हणून आमची काहीच ओळख नाही ?? सांग ना !! मी त्या क्षणी निरुत्तर झालो.

ठरवून असं काहीच होत नाही. आणि नशीबा पुढे काहीच मिळत नाही. म्हणून तेव्हाच ठरवलं आता स्वतःसाठी लिहायचं. शब्दांच्या दुनियेत आपण आता स्वतः ला पहायचं. आणि नव्याने पुन्हा सुरुवात करायची. शब्दांना पुन्हा नव्याने बोलायला लावायच. इतकं की शब्दही पुन्हा नव्याने मला मनसोक्त बोलतील. कसं असतं ना !! आपण शेवटी कितीही चेहरे पाहिले तरी आपल्याला आपल्या चेहऱ्याची ओढ ती काही वेगळीच वाटते. तसच काहीस माझं आता झालंय. नेहमी शब्दांच्या दुनियेत अनोळखी चेहरे मी खूप व्यक्त केले आणि एक चेहरा तो नेहमीच राहून गेला, आणि तो म्हणजे स्वतःचा !! पण अलगद या चेहऱ्याला आता मला रंगवायचं आहे. कित्येक भाव मला माझ्या शब्दात मांडायचे आहेत. कित्येक कविता लिहायच्या आहेत ज्यांना शब्दात मला गुंफायच आहे. ना कोणा वाचकाची वाट पाहणे ना कोणा अनोळखी चेहऱ्याची ओढ ! ओढ ती फक्त स्वतःची स्वतःसाठी !!

आजपर्यंत नात्यांना मी माझ्या शब्दात लिहिलं. रागाला त्या भावनेत व्यक्त केलं, त्या प्रेमाला मी कवितेत मांडलं. पण हे सगळं झालं ते अनोळखी चेहऱसाठी त्यात मी कुठे होतो ?? मलाच माहीत नाही. पण मग आता मी शोधू तरी कुठे स्वतः ला!! आजही प्रश्न पडतो आणि उत्तरही मिळत. अंतर्मनात!! त्या खोल मनात मी मलाच कुठेतरी दडचून ठेवलंय. ज्याला वर यायचं आहे. मुक्त फिरायच आहे. त्याला शब्दात व्यक्त व्हायचं आहे. त्याला स्वतःचा चेहरा पाहायचा आहे. मला पुन्हा लिहायचं आहे !! हो मला पुन्हा लिहायचं आहे !! स्वतःसाठी !!!

✍️ योगेश

Tags अनोळखी चेहऱ्याची ओढ शब्दांच्या दुनियेत हो मला पुन्हा लिहायचं आहे

RECENTLY ADDED

दुपारचं उन्ह || मराठी लेख || Marathi ||
दुपारचं उन्ह || मराठी लेख || Marathi ||
gold buddha figurine in gold and red floral dress
गणपतीची पट्टी || Ganapati Utsav ||
woman in black long sleeved shirt
तुमच्या आयुष्याचे निर्णय कोण घेत ? तुम्ही की दुसरं कोण ? || Marathi Lekh ||
brown framed eyeglasses on a calendar
वाढदिवस || तिथी की तारीख || Marathi ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

TOP POST’S

a couple wearing brown leather jacket

प्रेम माझं || HRUDAYSPARSHI KAVITA ||

प्रेम म्हणतं मी ते व्यक्त करायला जावं हातात गुलाबाचं फुल देताना नेमकं तिच्या बाबांनी पहावं बाबा हाच आला होता तिने अस का म्हणावं आणि पुढचे काही दिवस मग एका डोळ्यानेच पहावं
Dinvishesh

दिनविशेष ११ सप्टेंबर || Dinvishesh 11 September ||

१. आझाद हिंद सेनेने जण गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले. (१९४२) २. World Wildlife Fund ची स्थापना करण्यात आली. (१९६१) ३. भारतीय सैन्याने लाहोर जवळ बुर्की हे गाव आपल्या ताब्यात घेतले. (१९६५) ४. महात्मा गांधींनी पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत अहिंसेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनात सत्याग्रह ही संकल्पना वापरली. (१९०६) ५. इराक आणि सऊदी अरेबियाने नाझी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. (१९३९)
green white and red flag under white clouds

दिनविशेष १५ ऑगस्ट || Dinvishesh 15 August ||

१. ब्रिटीश सत्तेतून भारत देश स्वतंत्र झाला. (१९४७) २. फ्लोरिडा मधील पनामा शहराची स्थापना कंक्विस्ताडोर पेड्रो अरियास डविल्ला यांनी केली. (१५१९) ३. पंडीत जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. (१९४७) ४. अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले. (१९७१) ५. भारतात पहिल्यांदाच दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली. (१९८२)
श्रीगुरूचरित्र अध्याय १८

श्रीगुरुचरित्र अध्याय २१ || Gurucharitr Adhyay 21 ||

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ सिद्ध म्हणे नामधारका । ब्रह्मचारी तो कारणिका । उपदेशिले ज्ञानविवेका । तया प्रेतजननीसी ॥ १ ॥ ब्रह्मचारी म्हणे नारी । मूढपणें दुःख न करी । कवण वाचला असे स्थीरी । या संसारी सांग मज ॥ २ ॥
श्रीगुर्वाष्टकम् || Devotional ||

श्रीगुर्वाष्टकम् || Devotional ||

शरीरं सुरुपं तथा वा कलत्रं, यशश्र्चारु चित्रं धनं मेरुतुल्यम् । हरेरंघ्रिपद्मे मनश्र्चेन्न लग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ १ ॥

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest