भाग ३
समीर घाईघाईत घरातून बाहेर पडला. त्याला कधी एकदा सचिनला भेटेन अस झाल होत. मनातल वादळ त्याला शांत राहू देत न्हवत. खरंच तुषार आणि सायली एकमेकांवर प्रेम करतात का ? मग ही गोष्ट मला सायलीने का सांगितली नाही. अश्या कित्येक विचारात समीर सचिनच्या घरी आला. तिथे पोहचताच त्याला तूषारही तिथेच भेटला. आता त्याला काय बोलावे हेच कळत न्हवते. तुषार समोर कसे बोलणार सायली बद्दल म्हणून तो गप्पच राहिला.
“काय समीर कस काय येणं केलंस सचिनकडे?” तुषार थोडा मिश्किल हसत म्हणाला.
“काही नाहीरे सहजच आलो होतो!!”
“सहजच!! बरं बरं ठीक आहे !! अरे सायली होती कारे घरी?” तुषार असा विचारेन अस समीरला कधी वाटलं ही न्हवत.
“काही पाहिलं नाहीरे !!” समीर बोलून गेला.
“अरे आज भेटणार होतो आम्ही !! तिकडेच चलो होतो म्हणून विचारलं की ती निघाली असेन तर मला जावं लागेल!!” तुषार या बोलण्याने समीरला काय बोलावे तेच कळेना. तो तिथून निघण्याचा प्रयत्न करू लागला.
“चल मी जातो आता!!”
“अरे समीर आलास काय आणि चालास काय थांब थोडा वेळ!!” सचिन समीरला म्हणू लागला.
“नको अरे!! मला काम आहेत!! जायचं होत बाहेर!! “
सचिनला तुषार जे बोलला त्यावर विश्वासाचं होत न्हवता. सायली आजपर्यंत माझ्याशी का लपवत होती. की तुषार आणि ते भेटतात म्हणुन. कधी तिने याचा विषयही का काढला नसेन. सायली का वागली आसेन माझ्याशी अशी. कित्येक विचाराचा कल्लोळ समीरच्या मनात होता. ती सांज वेळ होती आणि समीर घरी येऊन गच्चीवर बसून सुर्यास्त पहात होता. कदाचित आजही त्याला फक्त त्याचीच साथ होती. वहीच्या पानावर तो लिहू लागला मनातलं सगळं काही मांडू लागला.
“नकळत या मनास का
वेड लागले कोणाचे
कधी भासे मझ ते आपले
कधी वाटे ते परक्याचे
कदाचित चुकली असेन
मनात समजूत नात्यांची
कधी आपले दुखावले
तर कधी हासू हे परक्याचे
साद घालत आपुल्यास तेव्हा
मी शोधले माझ्या मनास
कधी भेटला एकांत नी
कधी भेटला उपहास
नकळत या मनास का
वेड लागले कोणाचे!!!
सुर्य ही आज केव्हाच मावळला होता. समीर कित्येक वेळ तिथेच बसून होता. अंधार झाला तरी तो गच्चीवरच होता. तेवढ्यात समीरची आई तिथे आली कित्येक वेळ समीर आलाच नाही म्हणून त्याला पाहायला वर आली.
“समीर अरे अंधार झाला तरी आज तू गच्चीवर कसा थांबला?” आईच्या या बोलण्याने समीर अचानक भानावर आला. त्याच लक्ष कुठेतरी पार विचारत गडून गेलं होत.
“काही नाही आई असच आज बसावस वाटलं म्हणुन!!!”
“सुर्यास्त नंतर तुला ती संध्याकाळ उदास वाटते ना ?? तरीही तू वर आहेस ?? काय झाल समीर सांगशील??” आई समीरला मनापासून विचारू लागली.
“आई बघ ना!! काल परवा पर्यंत आपली वाटणारी माणसं क्षणात परकी वाटायला लागतात ना!!! समीर आता आईला मनातल बोलत होता.
“कोणा बद्दल म्हणतोय समीर ??”
“सहजच वाटलं अस म्हणुन!!कित्येक क्षण ते असे सहज विसरून जातात!! आपल्याला त्यांच्या बद्दल काही माहितच नाही अस वाटायला लागतं!!”
“समीर!! आयुष्यात माणसं खुप येतात, काही सतत सोबत असतात तर काही क्षणाचे सोबती असतात!! ” आई समीरकडे पहात म्हणाली.
“पण आई समोरच्याला इतकं विसरता येत??”
“विसरायचं असेन तर विसरायचं !! शेवटी आयुष्य कसं जगावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे!! तुझ्या आयुष्यात अस कोणी आल तर याच वाईट ते का वाटावं!!
समीर आणि आई बोलत होते कित्येक मनातले किंतू समीर आईला विचारत होता त्यांचं हे बोलण चालू असतानाच. सायली घरी येताना दिसली. समीर तिला पाहून थोडा गोंधळला पण काहीच न बोलता तो गच्चीवरून खाली आला.
“काकु , तुमच्याकडे काम होत!!” सायली समीरच्या आईकडे पाहत म्हणाली.
“हो आलेच!! “
समीर सायली कडे न पाहताच बाहेर निघून गेला. सायलीला हे लक्षात आल पण ती काहीच बोलली नाही.
“काकु समीर असा का निघून गेला??”
“”तुला बोलला नाही तो??” आई सायलीला विचारत होती.
“नाही!! बरं काकु उद्या आईने तुम्हाला बोलावलंय आणि समीरला पण सांगा ये म्हणुन! उद्या माझा वाढदिवस आहे ना म्हणुन!!”
“अरे वा !! नक्की येऊ आम्ही!! “
“बरं !! येते मी काकु!!”
सायली निघुन गेली. समीर आपल्याशी का बोलला नाही याचा विचार करत ती घरी गेली. उद्या माझा वाढदिवस आणि समीर आला नाहीतर कस होईन. तुषार आणि सचिनही येतीन वाढदिवसाला. पण समीर असा वागला का माझ्याशी!! मला त्याला काहीतरी बोलायचं होत पण ते राहूनच गेलं. जाऊदे उद्या येऊन तेव्हा बोलेन मी नक्की.. पण आलाच नाहीतर ..?? अश्या कित्येक विचारत सायली होती.
पण उद्या आला की असा का वागतोय ते मी विचारणार आहे मी त्याला …!!