बहरून गेला सांज तो वारा, चाहूल तुझ्या येण्याची !!
हुरहूर त्या ओल्या वाटेवरी का ? उगा तुला शोधण्याची !!
सांगतो अबोल शब्दास त्या काही, कविता तुझ्या प्रेमाची !!
प्रत्येक पान बोलेन मग तेव्हा, गोष्ट त्या आठवांची !!
इथे असे क्षण ते अपुरे, सल मनी विरहाची !!
भरावी नजरेची कडा ती तेव्हा, जाणीव रिक्त मिठीची !!
बरसून गेल्या सरित मग तेव्हा , रात्र भिजावी स्वप्नांची !!
खिडकीत बसून तू मग तेव्हा, साथ द्यावी जगण्याची !!
अस्तास चालला सूर्य ही तेव्हा, आठवण त्या वचनाची !!
उद्या पुन्हा भेटेन मी इथेच, ओढ तुझ्या भेटीची !!
उद्या पुन्हा भेटेन मी इथेच, ओढ तुझ्या भेटीची !!
✍️©योगेश खजानदार
*ALL RIGHTS RESERVED*