"हल्ली तुझ्यात नी माझ्यात ! वादच होत नाहीत !! कारण, हल्ली तुझ्यात नी माझ्यात संवादच होत नाहीत !! ओळखीची ती वाट आपली!! पण, त्या वाटेवरती आता भेटच होत नाही !! कारण , हल्ली तू आणि मी सोबत असूनही सोबत नाहीत !! तो आपुला क्षण, सांगतो खूप काही! आता पुन्हा तो आठवांचा पाऊस नाही !! बरसत आहेत कित्येक सरी त्या !! पण ती ओल कुठेच दिसत नाही !! तुलाही हे कळतंय, मलाही हे कळतंय !! पण मनापर्यंत पोहचतच नाही!! कुठे काय बिनसले आहे !! दोघांनाही आता कळत नाही !! शब्दांची गरज आहे या नात्यात !! पण नजरेने बोलणं थांबवलं ही नाही !! शोधलं खूप मी तुला , शोधलं तू खूप मला !! पण शोधुनही आपण सापडलो नाहीत !! विसरून जाऊ आपण अनोळखी जगात !! जिथे आपले कोणीच नाही !! आहे वेळ अजूनही या नात्यात !! जिथे आपल्या शिवाय कोणीच नाही !! फेकून द्यावी मनातली जळमटे!! ज्याचा काहीच उपयोग नाही !! कारण, तुझ्यात नी माझ्यात !! यामुळे नातच टिकत नाही !!!" ✍️© योगेश *ALL RIGHTS RESERVED*