“दादा !!” रामा ने हाक मारली.
“कोण आहे रे!!”
“दादा !! तुम्हाला भेटायला कोणी तरी आलय बाहेर?!!”
“बर थांब!! आलो मी !!बसा म्हणं !!”
कोण आलं आहे. पहायला सुहास बाहेर गेला. समोर एक स्त्री बसली होती. सुहास तिच्याकडे पहाताच थोडा गोंधळुन गेला. ती शितल होती. कित्येक वर्षां पुर्वीच प्रेम पुन्हा त्याच्या समोर होतं.
“शितल !! किती दिवसांनी भेटतेयस !”
“यावं लागलं रे मला!! तुझ्या शब्दांनी खेचुन आणलं मला आज!” सुहास ने लिहिलेलं पुस्तक तिच्या हातात होतं.
“तु वाचलंस पुस्तक??”
“हो!! वाचलं मी!! तुझ माझ्यावर इतक प्रेम होतं हे मला कधी कळलंच नाही! !”
सुहासला काय बोलावं तेच कळेना. शितल अशी आपल्याला भेटायला येईल याचा त्याने कधी विचारही केला नव्हता
“तु अशीच पुन्हा परतावी
मी किती तुझी वाट पाहावी
तुझं कळेल हे प्रेम किती
परतुन ती सांज यावी!!
किती गोड लिहिलंयस हे तु!!” शितलने सुहासच्या पुस्तकातील काही ओळी म्हणुन दाखवल्या.
“तु निघुन गेल्यावर मला काहीच कळेना! तुझ्यावर रागावु की स्वतःवर तेच कळेना! शेवटी मनातल कुठेतरी मोकळं करायचं होतं!! या शब्दांनी आधार दिला!!’ सुहास डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला.
“सगळं मनासारखं होतं अस नाही रे! ‘ शितलंही आता मनातील दुख डोळ्यातुन टिपत होती!!
“आपण का वेगळे झालो याच पुन्हा मला बोलायचं नाहीये! !’ पण सुहास मी ही खुप वाट पाहिली रे तुझी!!”
“शितल मी बंधनात अडकलो होतो!! ज्या शब्दांनी आज माझ प्रेम पुन्हा मला भेटायला आणलं त्याच शब्दांनी त्यावेळी माझा घात केला!!” सुहास शितलच्या हातातील पुस्तकाकडे बघत बोलत होता.
“बाकी, आज माझ्या प्रेमानेच माझ्या पुस्तकाची स्तुती केली !! छान वाटलं.!! “
“पण असं समजु नकोस हं !! मी भेटायला आले म्हणुन माझा रुसवा जाईल! जवळं होतास त्यावेळी कधी ऐकवली नाहीस पण आता तुला माझ्यासाठी कविता ऐकुन दाखवावी लागेन बरं!!”
शितलं गोड हसतं म्हणाली.
“या पुस्तकातीलच एक ऐकवु??” सुहास तिच्याकडचे पुस्तक हातात घेत म्हणाला.
“हो ऐकवं ना!!’
“पुन्हा जगावे ते क्षण
तुझ्या सवे आज सखे
तु समोर असताना
व्यक्त व्हावे मन जसे
ती सांज तो वारा
पुन्हा ती वाट दिसे
ते नभ ही पाहता
चांदणी ती एकाकी असे
आठवणीत शोधताना
तु आसवात दिसे
चंद्र हा हरवला
मनी का सल असे
शब्दांत तुझ पहाताना
एक भास का दिसे
तु पुन्हा भेटावीस
मन हे अधीर दिसे
पुन्हा जगावे ते क्षण
तुझ्या सवे आज सखे!!! “
सुहास शितलकडे बघुन कविता म्हणाला.
“व्वा खुप छान! सुहास !! खरंच आज मला खुप बरं वाटलं तुला भेटुन!! मनातल सगळं बोलुन !! ” शितलं डोळ्यातील अश्रू टीपत म्हणाली.
“मला ही बरं वाटलं तु मला भेटायला आलीस.!! आपलं एकमेकांवर प्रेम होतं आणि ते तसंच राहिलं!! क्षणांनी थोडी धुळ केली तर या पुस्तकाने साफ करायची!! आपलं प्रेम नेहमी चिरतरुण राहिलं!! सुहास शितल कडे पाहुन गालातल्या गालात हसला.
शितलाही सुहासचं नवलं वाटलं. काळाने जरी वेगळं केल तरी सुहास शब्दांनी, मनाने तिच्यावर आजही तसाच प्रेम करत होता.
“पुस्तकाच नावं बाकी मस्त आहे!! ..”शब्द की भावना!” शितल पुस्तकाकडे बघत होती.
खुप वेळ झालाय हे शितलंला लक्षातच आलं नाही. घड्याळात पहात ती म्हणाली..
बर… येते मी ! पुन्हा भेटायला येईल नक्की !! काळजी घे!”
एवढं बोलुन शितल निघुन गेली. सुहास तिला जाताना नुसता पाहत होता. ओठांवर एक गोठ हसु होतं पुस्तकात शब्द होते आणि मनात भावना ..
समाप्त
✍️योगेश