Skip to content

  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • चित्रबद्ध
  • कॅटेगरीज
  • संपर्क

मुखपृष्ठ » मराठी लेख » लोक काय म्हणतील || MARATHI LEKH ||

लोक काय म्हणतील || MARATHI LEKH ||

लोक काय म्हणतील || MARATHI LEKH ||

7

लोक काय म्हणतील !! या एका वाक्यात आपण कित्येक वेळा आपल्या मनातील गोष्टी करतच नाहीत. मला ते करायचं होत पण लोक काय म्हणतील म्हणून मी ते केलच नाही असे म्हणत किंवा मनात असेच विचार ठेवून राहणारे कित्येक असतात. आजही या गोष्टीचा परिणाम आपल्या मनात होताना दिसतो. मला आजही अनुभव येतात. आपण कित्येक नवीन गोष्टी करताना पहिले लोक काय म्हणतील याचाच विचार करत बसतो. आणि आपण आपल्याच मनाला मुरड घालत राहतो.

खरंतर लोक काहीच म्हणत नसतात किंवा माणसांना काही म्हणायच ही नसत पण आपलेच मन कित्येक तर्कवितर्क काढत बसते आणि जे करायचं ते राहून जात. मला वाटतं याचा विचार खरंच करणं तितकं बरोबर नसत. मी परीक्षेत नापास झालो, मग लोक काय म्हणतील असे आपण विचार करत बसतो किंवा आपले मित्र पास झाले याचा. खरं तर याचा विचार करत बसण्या पेक्षा आपले मित्र आभ्यासात आपल्या पेक्षा कुठेतरी पुढे आहेत आणि आपल्याला अजुन तयारी करायला हवी आणि त्या कामाला लागले पाहिजे . कारण पुढे तुम्ही यशस्वी झाल्यावर हेच लोक तुमची स्तुती करणार हे मात्र खरं. मनातल सांगताना किंवा एखादी गोष्ट करताना आपण स्वतःचा विचार करायला हवा असे मला वाटते. लोक काय म्हणतील म्हणून आजही कित्येक स्वप्न मनातच राहून जातात. चार ओळी सुचल्या आणि त्या कशाही असो मला त्या मांडता आल्या याच मनाला कौतुक असायला हवं. कारण आपण व्यक्त झालो याला महत्त्व असतं.

लोक काय म्हणतील जर मी हे केलं तर, अस जर कित्येक थोर विचारवंत म्हणत बसले असते तर त्याचे विचार आज आपल्या पर्यंत आलेच नसते. वेडात विर दौडले सात!! यांनी विचार नाही केला लोक काय म्हणतील याचा, स्वराज्य स्थापन करणारे शिवाजी महाराज असेच विचार करत बसले असते तर हिंदवी स्वराज्य मनातच राहील असतं. सावरकरांनी समुद्रात उडी मारण्या आधी लोक काय म्हणतील याचा विचार केला असता तर !! असे कित्येक उदाहरण देता येतील. तुम्ही जे करता त्याला लोक काय म्हणतील हे महत्त्वाचं नसत तर महत्त्वाचं असत ते तुम्ही किती मनापासून ती गोष्ट करता आहात याच.

खरंतर तुम्ही कित्येक गोष्टी पाहू शकता ज्या पहिले दिसायला खुप छोट्या दिसतात पण ती करण्याची ताकद त्या गोष्टी मोठ्या करते. कित्येक विद्वान , कित्येक महापुरुष यांनी या छोट्या गोष्टीतून मोठ्या गोष्टींना सुरुवात केली आणि ते मोठे झाले. कारण त्यांची त्या कामा बद्दल तेवढी तळमळ होती.

आपण लोक काय म्हणतील याचा विचार करत बसण्यापेक्षा आपण जे करणार आहोत त्याबद्दल आपली शक्ती, आपली चिकाटी किती आहे हे पाहणं गरजेचं आहे. तुम्ही जे विचार मांडत आहात तेच लोक ऐकतील पण जर तुम्ही लोकाचं ऐकत बसलात तर तुम्ही फक्त ऐकत राहाल. आज इतिहासाचे कित्येक पाने उलटून पाहिल्यावर आपल्याला असे दिसेल की कित्येक अशक्य गोष्टी शक्य झाल्या. कारण त्यांचा स्वतःवर जास्त विश्वास होता. लोक किंवा समाज हा तुम्हाला दोन्हीही बाजूने बोलेल, फक्त फरक एवढाच असतो की कधी तुमच्या बाजूने बोलणारे जास्त असतील आणि कधी तुमच्या विरोधात बोलणारे जास्त असतील. पण जे बोलतात त्याच मत कधीच होऊ शकत नाही ती एक प्रतिक्रिया असू शकते. विरोध किंवा सहभाग होतच राहणार पण यात आपलं मत खोडून जाता कामा नये. कारण तुम्हाला तुमचं मत असणं खूप गरजेचं असतं. तुम्हाला विरोध होईल किंवा सहभागही असेल पण लोक काय म्हणतील म्हणून आपण आपल्या मनाला मुरड कधीच नको.

शेवटी कसं असत , आपण जे करतो त्याला महत्त्व असतं. या लोकांच्या समूहात तुम्ही नक्कीच छान राहाल पण स्वतःच अस्तित्व हवं असेन तर याच समाज, लोक यांचा काय म्हणतील हा विचार मनाला कधीच स्पर्श करू द्यायचा नसतो. नाहीतर तुम्ही फक्त तेच करू शकाल जे हा समाज ही लोक बोलतील, तुमचं स्वतःच अस मत काही उरणारच नाही. शेवटी विचार आपणच करायाचा असतो लोकांनी नाही …!!

✍योगेश खजानदार

Tags Marathi articles

READ MORE

मी आणि माझी आई . || AAI MARATHI ESSAY ||
आई बाबा !! तुम्ही अडाणी आहात !!
हरवलेल्या गावाकडे || GAVAKADCHYA GOSHTI ||
विस्कटलेले नाते || VISKATLELE NATE || MARATHI ||

TOP POEMS

विरह || Virah|| Marathi Kavita ||

साऱ्या साऱ्या रित्या केल्या कालच्या आठवणीं सांग सांग काय सांगू तुझ्या विन न उरे काही

शब्द व्हावे बोलके || LOVE POEM || KAVITA ||

ओठांवरच्या शब्दांना मार्ग हवे मोकळे तु आहेस जवळ पण, शब्द व्हावे बोलके हे प्रेम नी भावना नकळत जे घडते अबोल त्या बंधनात शब्द व्हावे बोलके

एक जिद्द म्हणजे तरी काय ??|| Motivational quotes|| Must Read

ध्येयवेड्या माणसास नकोच खंत कोणती !! मार्ग एक चालताच , नसावी त्यास भीती !! प्रयत्न जणू असे करावे, हरण्याची नसावी गिनती !! रुतेल तो काटा अपयशाचा, पण मन नसेल दुःखी !!

चाहूल || CHAHUL KAVITA ||

चाहूल कोणती ती आज मनास माझ्या आठवणीतल्या त्या घरास ठोठावले ते दार क्षणांचे जेव्हा कोण आले हे दारात ओळखीचा वाटे का आवाज साद मझ का बोलावण्यास मी पाहिले पुन्हा वळून जेव्हा कोणीच नव्हते का दारात

शेवटचं एकदा बोलायचं होत || LOVE POEM || MARATHI ||

"शेवटचं एकदा मला, बोलायचं होत!! प्रेम माझ तुला, सांगायच होत!! सोडुन जाताना मला, एकदा पहायच होत!! डोळ्यातली आसवांना, बोलायचं होत!!

एक वचन || EK VACHAN || MARATHI PREM KAVITA ||

तिच्या मनात खुप काही आहे, पण त्याच्या सहवासात तिला काही सुचतच नाही. क्षणात खूप जगतेय ती त्याच्यासवे आणि मग अलगद आयुष्यभराची साथ मागते आहे ..!! नकळत तेव्हा क्षणही थांबले आहेत ..!! .. मनातल्या तिच्या भावना जणू म्हणतात ..

TOP STORIES

सहवास || कथा भाग १ || MARATHI LOVE STORIES ||

सरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत पण अखेर रागचं मनात का ??

बंगला नंबर २२ || कथा भाग २ || सरप्राइज || मराठी भयकथा ||

"प्रिया !! एक मिनिट हा !! मी तुला नंतर कॉल करतो !! " "अरे !! काय झालं !! श्रीधर !! श्रीधर !! " प्रिया बोलतं राहिली.

शर्यत || कथा भाग ३ || Sharyat Marathi Story ||

"भाडकाव माझं काम घेतो !! तुला तर आता जित्ता नाही सोडत !!" सखा कसाबस उठायचा प्रयत्न करतो. पण पुन्हा शिरपा त्याच्या हातावर लाथ मारतो. सखा जोरात खाली पडतो. "साहेबांच इतक्या वर्षांचा जवळचा माणूस आहे मी !! आणि काल एक दिवस नव्हतो तर तू कुठून आला र !!" सखा हात जोडून उभा राहायचा प्रयत्न करतो. "पर !! मला तुमचं काही माहीत नव्हतं शिरपा ! " "आता कळल ना !! निघायचं आता !! पुन्हा जर दुकानात दिसला तर जिता नाही ठेवायचो तुला !!" "पण साहेब ?? आप्पा !!"

आई || कथा भाग ७ || मराठी कथा || Story ||

दिवसभराच्या कामानंतर शीतलला कधी एकदा फ्लॅटवर येते आहे अस झालं होत. ती ऑफिसमधून लगबगीने येते. सगळी कामे आवरून पुन्हा उद्याच्या प्रेझेंटेशनची तयार करू लागते. रात्रीच जेवण करण्याची सुद्धा आठवण तिला येत नाही. कामात व्यस्त असतानाच समीरचा फोन येतो

बंगला नंबर २२ || कथा भाग ५ || वासना || मराठी कथा ||

"काय हवंय तुम्हाला ??" "मला तू हवी आहेस ??" देशमुख साहेब पुढे येत म्हणाला. "अस काय करताय साहेब तुम्ही !! प्लिज तुम्ही इथून जा !!"

स्वप्न || कथा भाग २ || MARATHI STORIES ||

घराचा दिवा पोरगं जणू घराची वात पोरगी असते घरात सारे शिकले तर घराची प्रगती होत असते

Contact Us

khajandar_yogesh@yahoo.in
+919923777633

Services

  • Home
  • About Us
  • FAQ

Quick Links

  • Privacy Policy
  • Categories
  • Copyrights Policy
  • RSS Feed

FeedBack Message

  • EMail Us
  • WhatsApp

Social

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
  • Youtube
  • Pinterest

Informaion

  • Terms
  • Photogallery
  • Blog
  • Community

Navigation

  • Menu
  • Pages
  • HTML SITEMAP

NewsLetter

Subscribe to our newsletter!

CopyRights©2022 All Rights Reserved || मराठी कथाकविता.com

Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy