राहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं!! शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं!! मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत!! पण त्या वेड्या मनाला सांगूनही कळूनही काही कळत नसतं!! कारण काहीतरी पहायचं असतं सावल्यातील चेहऱ्याला ओळखायचं असतं!! हरवून गेलेल्या क्षणांना शोधताना उगाच स्वतःही हरावयच नसतं!! तिथे अबोल कोणी सापडत ही असतं त्याला उगाच बोलायच असत!! विसरून गेलेल्या नात्याला तेव्हा उगाच आसावत पहायचं नसतं!! कुठे दुःख मिळालं तर कुठ सुख ही असतं कधी हसू तर कधी रडु ही असतं!! काही सुटलं हातातून तर काही मिळालं जेव्हा हिशोब आयुष्याचा करताना हे पहायचं नसतं!! शेवटी उरले काय पाहत असतं मन वेड फिरत असतं !! फिरून फिरून थकलेल्या मनाला आठवणीच्या पावला शिवाय काही मिळत नसतं!! -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
क्षण सारें असेच , खूप बोलून जातात , जणु कोणाचे शब्द, मनास बोलत राहतात !!
रुसव्यात त्याची समजूत, जणु…
Read Moreचाल पुढं नको डगमगू, बोलते ती ज्योती !!
स्वतःस का जाळून घेते, कोणती ही वृत्ती !!
असावी पुन्हा नव्यान…
Read Moreध्येयवेड्या माणसास नकोच खंत कोणती !!
मार्ग एक चालताच , नसावी त्यास भीती !!
प्रयत्न जणू असे करावे, हर…
Read Moreआठवणीत त्या माझ्या, तुलाच मी जपावे !!
चित्र काढावे माझे !! रंग तुझे भरावे !!…
Read Moreचांदण्यात हरवून, रात्र ती आज गेली!!
चंद्र तो सोबती, परी शोधसी न कोणी !!
लख्ख तो प्रकाश, बोलतो न क…
Read More“भरतील सभा, जमतील लोक
आपण मात्र भुलायच नाही !!
उमेदवाराची योग्यता पाहून
मतदान करायला विसराय…
Read More
Comments are closed.