Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » मराठी लेख

मनाचा गोंधळ || MANACHA GONDHAL ||

Category मराठी लेख
मनाचा गोंधळ || MANACHA GONDHAL ||
Share This:

कधी शब्द सुचत नाहीत तर कधी स्वतः मनात घोळतात. याच नक्की होते तरी काय हेच कधी समजत नाही. तुम्ही तासन् तास लिहायचं म्हणून बसता आणि एक ओळही लिहून होत नाही आणि कधी कधी स्वतः शब्द मनात कोरले जातात. मला आजही कित्येक कविता लेख लिहिताना याचा अनुभव आल्या शिवाय राहत नाही. कधी कधी तासन् तास बसून लिहिलेल्या ओळी मनास भावत नाहीत आणि कधी कधी सहज सुचलेल्या चारच ओळी मनात घर करतात. असे होत तरी काय की मनातले खेळ समजु शकत नाही. भावना मनातल्या खुप काही बोलतात. तर कधी बोलायचं म्हटल तरी शब्द सुचत नाहीत. कदाचित लिहिण्यासाठी त्या भावना भेटत नाहीत. उरतात कधी नुसते शब्द आणि कधी कधीं नुसत्या ओळी..

मनातल्या भावना आज
सहज कोऱ्या कागदावर आल्या!!
कधी नुसत्या भावना होत्या
कधी नुसत्या ओळी आल्या!!

म्हणजे नक्की म्हणायचं तरी काय मला तेच कधी कळतं नाही. आणि कधी न बोलता ही सर्व काही त्या ओळी बोलून गेल्या. माझ्या मनातल्या खुप काही गोष्टी मी अशाच व्यक्त झालो. कित्येकदा त्या मनास भिडल्या पण कित्येकदा नुसत्या ओळीच राहिल्या. मग लिहावं तरी का आणि कशासाठी हा प्रश्न मनी राहिला. मी समजलो का तुला प्रश्नही कधी मनात आला. आणि कधी न लिहिता ही सर्व काही बोलला. अस लिहिताना का होत? मी आज कित्येक वर्ष झाले ब्लॉग मार्फत किंवा कविता , लेख मार्फत लिहिण्याचा व्यक्त होण्याचा प्रयत्न केला. पण तो कित्येक मनाला भिडला हा प्रश्न कधी स्वतःला ही मी विचारला नाही. मी फक्त लिहीत राहिलो. व्यक्त होत राहिलो. असं म्हणतात की लेखणी हे समोरच्याला व्यक्त करून सांगण्याच सर्वात सुंदर साधन आहे. पण ही लेखणीही जर व्यर्थ ठरत असेल तर लिहावं तरी का असा प्रश्नही मनात आला.

कुठे बंदिस्त कवाड या मनाचे
लेखणी तु व्यक्त केलेस!!
घुसमटलेल्या विचारांचे
किती तु शब्दांनी खेळ केलेस!!

मग कुठे अधुरे राहिले हे शब्द नी समोरचे मन कधी समजुच शकले नाही. आज मागे वळून पाहताना मला कित्येक प्रश्न हेच पडतात. मी का व्यक्त झालो आणि कोणासाठी. माझी लेखणी अधुरीच राहिली त्या मनासाठी जिथे शब्द पोहोचलेच नाहीत. कधी कधी लिहिलेलं सगळं व्यर्थ वाटतं. पण तरीही मनातले ते विचार शांत बसूच देत नाहीत आणि पुन्हा लेखणी हातात येते. होतो विचारांचा नुसता गोंधळ आणि शब्द हे आपोआप कागदावर कोरले जातात. माहीत असतं हे सगळं व्यर्थ आहे पण ते तरी लिहिले जातात कोणासाठी तर बंद झालेल्या कवाडावर जाऊन निरर्थक पडण्यासाठी. कधी कधी मला वाटतही की ते शब्दही आता माझा तिरस्कार तर करतं नसतील ना? की व्यर्थ लिहीत बसलेल्या माझ्या मनातल्या विचाराशी भांडत तर नसतील ना? की लिहितोस तू इतका की समोरच्या मनाला साधं समजूनही सांगता येत नाही. मग आरे बंद कर तो व्यर्थ प्रयत्न तुझ्या लेखणीत तेवढी धमक ही साधी नाही.

लेखणी तुझी व्यर्थ बडबडत असते
नसेल त्याला अर्थ काही!!
दे फेकून ती कागदांची आठवण
ज्यात जळेल फक्त तुझे मन!!

वाटतं तेव्हा द्यावं फेकून ते लिखाण वहीत बंदिस्त केलेलं त्या धगधगत्या आगीच्या ज्वाळांत आणि मनाला सांगावं तुलाही असाच जळाव लागेल. पण तुझ्या ज्वाला दिसतं मात्र नाहीत रे.!! घुसमट होईल तुझी पण तुझ्या कागदाची किंमत ती काय रे?? मन कोणते ते बंदिस्त कवाडात आपल्याच विश्वात रमलेले येईल का रे तुझ्या मनातल्या ज्वाला शांत करायला?? नाही ना ?? मग जळत रहा कायमच अगदी शेवटपर्यंत !! कारण तुला दुसरी चीता च नाही जळायला!

शब्दही साथ सोडतील तुझी
अशी कशी रे कवाड मनाची!!
जळून गेली मनात सारी व्यथा
अशी कोणती साथ आपल्यांची??

शेवटी एवढंच लिहावस वाटतं

किती विचार आणि किती लिहावे
व्यर्थ सारे वाहून जावे.!!
नसेल अंत या लिखाणास कुठे तर
स्वतःस का मग जाळून घ्यावे?

अखेर….!!!!!

✍योगेश खजानदार

Tags Manacha gondhal Marathi articles marathi bhasha Marathi Blog

RECENTLY ADDED

दुपारचं उन्ह || मराठी लेख || Marathi ||
दुपारचं उन्ह || मराठी लेख || Marathi ||
gold buddha figurine in gold and red floral dress
गणपतीची पट्टी || Ganapati Utsav ||
woman in black long sleeved shirt
तुमच्या आयुष्याचे निर्णय कोण घेत ? तुम्ही की दुसरं कोण ? || Marathi Lekh ||
brown framed eyeglasses on a calendar
वाढदिवस || तिथी की तारीख || Marathi ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

TOP POST’S

Dinvishesh

दिनविशेष २१ जानेवारी || Dinvishesh 21 January ||

१. ब्रिटीश कमुनिस्ट वृत्तपत्र "डेली वर्कर" वर बंदी घातली. (१९४१) २. मेघालय आणि मणिपूर यांना राज्याचा दर्जा देण्यात आला. (१९७२) ३. थोरले माधवराव पेशवे यांनी पेशवाईची सूत्रे वयाच्या सोळाव्या वर्षी हाती घेतली. (१७६१) ४. जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पार्टीने सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या. (१९५२) ५. मिझोरम जो आसामचा भाग होता तो भारतीय केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषीत करण्यात आला. (१९७२)
Dinvishesh

दिनविशेष २१ जुलै || Dinvishesh 21 July ||

१. अलेक्झांडर केरेंस्की हे रशियाचे पंतप्रधान झाले. (१९१७) २. इंडोनेशिया मध्ये पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. (१९४७) ३. स्पेनमध्ये दोन प्रवासी गाड्यांमध्ये झालेल्या अपघातात ७०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९७२) ४. संजिवा रेड्डी हे बिनविरोध भारताचे ६वे राष्ट्रपती बनले. (१९७७) ५. सिरीमाओ बंदरणाके या श्रीलंकेच्या पंतप्रधान झाल्या. जगातील पहिल्या महिला पंतप्रधान त्या झाल्या. (१९६०)
man and woman sitting on grass field

तुझ्याचसाठी || TUJYACHSATHI MARATHI KAVITA ||

तुझ्याच या वाटेवरती, तुलाच न भेटावे तुझ्याचसाठी झुरावे मी, आणि तुलाच न कळावे सांगू तरी कसे नी काय, मनास कसे समजवावे राहूनही न राहता मग , नकळत तुला पहावे
Dinvishesh

दिनविशेष ४ फेब्रुवारी || Dinvishesh 4 February ||

१. श्रीलंका या देशाला स्वातंत्र्य मिळाले. (१९४८) २. जापनीज सैन्याने हर्बिन काबिज केले. (१९३२) ३. मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटची स्थापना केली. (२००४) ४. तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला पुन्हा स्वराज्यात सामील केला. पुढे तो किल्ला सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला. (१६७०) ५. पहिले इलेक्ट्रिकल टाइपव्राईटर विक्रीस उपलब्ध झाले. (१९५७)
श्री कालभैरवाष्टक || Ashtak || Devotional ||

श्री कालभैरवाष्टक || Ashtak || Devotional ||

श्री गणेशाय नमः । श्री कालभैरवाय नमः । श्री शिवांशपूर्ण आदि मध्य अंत ज्या नसे, बाह्य जया नसे उपाधि चार गर्जती असे । निर्गुणा निरंकुशा निरंजना निरंतरा, श्री हरेश्र्वराधिनाथ कालभैरवा स्मरा ॥ १ ॥

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest