Skip to content

  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • चित्रबद्ध
  • कॅटेगरीज
  • संपर्क

मुखपृष्ठ » मराठी लेख » नातं || NATE || MARATHI BLOG||

नातं || NATE || MARATHI BLOG||

नातं || NATE || MARATHI BLOG||

0

आयुष्य जगताना कधी कळतच नाही की आपण पुढे जाताना कधी कुठे कोणी दुखावले तर नाही ना? खुप काही बोलताना कोणाला शब्दानी लागलं तर नाही ना ? की नातं टिकवताना दुसरा कोणी रूसला तर नाही ना ? कित्येक गोष्टी अशा असतात ज्यांचा आपण कधी विचारच करत नाहीत. सुटतात काही गोष्टी ज्या पुन्हा कधी भेटतही नाहीत. खुप पुढे गेल्यानंतर त्या गोष्टी लक्षात आल्या तरी वेळ निघुन गेलेली असते. मग उरतो काय तर फक्त तिरस्कार. पण असं होतं ना!! जवळच्या व्यक्तीने कितीही दुखावलं तरी तिरस्कार मात्र आपण कधी करुच शकत नाहीत, हेही तितकंच खरं असतं. पण नातं पुन्हा जुळायला वाट थोडीच पहावी लागते. ते तर कधीही जुळु शकतं. फक्त आपली भावना निर्मळ हवी. दुखावलो , रागवलो , चिडलो तरी नातं मात्र तसंच हव अगदी कधीही न तुटण्या सारखं. त्यात स्वार्थ नसावा, खोटेपणा नसावा . फक्त असाव ते एक गोड नातं. खुप विचार करावा असंही नातं काय उपयोगाचा!! नाही का??

आपल्यामुळे कोणाला त्रास तर होतं नाही ना याचाही विचार करायला हवा. कारण कित्येक गोष्टी या आपण कोणावर लादत तर नाहीत ना याचाही विचार केला पाहिजे. उगाच बळजबरी म्हणुन नातं कधीच टिकु नये त्यात समजुदारपणा हवाचं. शिवाय नातं हे एका बाजुने कधीच टिकत नाही. त्यासाठी दोन्ही बाजुने तेवढाच समतोल हवा. कारण एकाचाही तोल गेला तर नातं हे ताणलं जातं आणि त्रास दोघांनाही होतो.

पण नातं जुळवायचं म्हणजे समोरचाही नातं पुन्हा सुरू करायला तयार असावा. कारण आयुष्यात पुढे गेल्यानंतर काहींना आपला भूतकाळ नको असतो. तो खोडता तर येतं नाही पण पुन्हा समोर यावा अस नको असतं मग कराव तरी काय? जुन्या या नात्याला असंच सोडुन द्याव? तर अजीबात नाही आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला बोलत नसलो किंवा ती व्यक्ती आपल्या जवळ आजही नसली तरी नातं हे संपत नाहीच ना. त्या नात्याची काळजी तुम्ही स्वतः घेऊच शकता. फक्त त्या व्यक्तीला आपला त्रास होता कामा नये. पण आपलं मन खरंच त्या नात्याला टिकवतं असेल जिवंत ठेवतं असेल ना तर ती व्यक्ती पुन्हा सर्व विसरून नक्कीच आपल्या आयुष्यात येईल हे नक्कीच.

शेवटी नातं हवं तरी कशाला असतं. आपलंस अस कोणीतरी वाटायला. आपल्या सोबत मनसोक्त आनंद लुटायला. कधी रडावंस वाटलं तरी सोबत जवळ बसायला. अगदी आयुष्यभराची साथ द्यायला हवी असतात ना ही नाती मग हे टिकवताना कशाला उगाच रुसायचं. झालं ते अगदी तिथेच विसरुन जायचं. कारण कधी कोणतं नातं हे कायमची आठवण होऊन जाईल ते कसं सांगायचं. पुन्हा हुरहुर कशाला काहीतरी मनात राहिल्याची. आणि कशाला गुंतागुंत या नात्याची,

नातं असावं एक सुंदर
वेलीवरच्या फुलांसारखं!!
उमलावं ते अगदी अलगद
मनातल्या भावना सारखं!!

वाटतं ना असं की नातं हे एक सुंदर वेलीसारखं असावं. उमलावी ती कळी नात्याची जणु की उघडावी दारे मनाची. नातं हे असच असतं फुलासारख नाजुक. ते उमलु द्यावं लागतं त्या विश्वासाच्या वेलीवर. तरंच त्या फुलांचा त्या नात्याचा सुगंध आनंद देऊन जातो.

सुगंध हा दरवळे असा का
मनास खेचे फुलापाखरा सारखं!!
ओढं त्या वेड्या फुलाची
पहावे त्यास वाटते सारखं!!

एकदा का त्या नात्याचा सूगंध आपल्या आयुष्यात पसरला की पुन्हा पुन्हा ते नातं आपल्याला जवळ ओढतं जातं. फुलपाखरा सारखं ते तिथेच भिरभिरत राहतं. त्यास पहाण्यास हे वेड मन अतुर होतं राहतं. कारण नातं हे प्रेमच देत राहतं. अगदी कायमं. म्हणुन नातं हे आयुष्यात खुप गरजेचं असतं. मग ते नातं कोणतही असो. कारण आपल्या व्यक्ति शिवाय हे आयुष्य शेवटी अधुरच असतं.

सुकता ते वेलीवरच फुलं
आठवणचं देऊन जातं!!
राहतं काय मनातं तर
ते वेडं हातात सुगंध ठेवुन जातं…!!!

हो ना?

✍योगेश खजानदार

Tags नात Marathi articles marathi lekh notes yks articles yks writing

READ MORE

गणपतीची पट्टी || Ganapati Utsav ||
तुमच्या आयुष्याचे निर्णय कोण घेत ? तुम्ही की दुसरं कोण ? || Marathi Lekh ||
वाढदिवस || तिथी की तारीख || Marathi ||
मी एक प्रवाशी स्त्री || STRI MARATHI ESSAY ||

TOP POEMS

पाऊस आठवांचा || POEM IN MARATHI ||

इथे जराशी थांब सखे आठवांचा पाऊस पडूदे..!! चिंब भिजावे तू ,चिंब भिजावे मी थोडी वाट ती भिजूदे ..!!

बाबा || Marathi Poem || Father’s day Special ||

तुमच्या बद्दल लिहिताना कित्येक विचार येतात बाबा आणि प्रत्येक शब्द मला कित्येक भाव सांगतात

मैत्रीण || MAITRIN || MARATHI KAVITA ||

निखळ मैत्री तुझी नी माझी खुप काही तु सांगतेस तुझ्या मनातल्या भावना अलगत का तु बोलतेस कधी असतेस तु उदास तर कधी मनसोक्त हसतेस माझ्या या मैत्रीची एक गोडी तु सांगतेस

एकदा तु सांग ना || EKADA TU SANG NA ||

या छोट्या पावलांना का खुडायच सांग ना मी मुलगी आहे म्हणून नाक का मुरडतात सांग ना ती पावलं माझी घरभर फिरतील मग त्या पावलांना का थांबवायचं सांग ना

जिथे मी उरावे !!JITHE ME URAVE KAVITA ||

आठवणीत त्या माझ्या, तुलाच मी जपावे !! चित्र काढावे माझे !! रंग तुझे भरावे !!

अखेर || AKHER MARATHI KAVITA ||

मी हरलो नाही मृत्युच्याही डोळ्यात पाहुन अखेर मी हरलो नाही मी एकटा ही नाही अंताच्या या प्रवासात अखेर मी एकटा नाही

TOP STORIES

विरोध || शेवट भाग || Marathi katha ||

प्रिती तुला माझ्याकडुन घटस्फोट हवाय !! हीच माझ्या प्रेमाची किँमत !! नाही प्रिती हे होणार नाही !! तुला मी माझ्यापासून दूर जावू देणार नाही !! बस्स !! आजपर्यंत खूप ऐकून घेतलं तुझ प्रिती !! दहा वर्ष छळलस मला त्या अनिकेतच्या आठवणीत !! तुला तुझ प्रेम मिळालं !! तू त्याच्याकडे निघून जातेय !! खरतर एका परपुरूषाशी तू माझ्या समोर प्रेमाची कबुली देत आहेस !! आणि मी फक्त बघत बसलो! !! माझ्यावर खोट प्रेम केलंस तू !! नाटक केलंस!! त्या अनिकेतला फसवलस,! नाही प्रिती इतक्या सहज मी तुला माझ्यापासून वेगळं होऊ देणार नाही !! तुला आता माझ्यापासून वेगळं एकच गोष्ट करू शकेल आणि तो म्हणजे मृत्यु

स्मशान || कथा भाग ३ || Gavakadchya Katha ||

सदा शिवाच्या मागे मागे चालू लागला. तसेतसे ते कंदील आणखी जवळ येऊ लागले. शिवा आणि सदा थोडे जवळ येताच त्या दिशेने बाईच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. त्या आवाजाने शिवा गोंधळून गेला. "आबा !! बाईंचा आवाज!!"सदा कुतूहलाने म्हणू लागला.

वर्तुळ || कथा भाग १२ || वास्तवाशी सामना ||

"मला वाटलं होत आपण खूप चांगले मित्र आहोत !! म्हणूनच तर मी तुला माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सांगत होते !! एक चांगला मित्र म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवत होते!! पण आजच तुझं बोलणं मला नाही आवडलं !!" सायलीचा मेसेज पाहताच आकाशला तिच्या या बोलण्याचा भयंकर राग आला, आधीच उद्याच्या रिझल्टच टेन्शन आणि त्यातून सायलीने त्याला दिलेले दुःख यातून तो सावरू शकत नव्हता,

द्वंद्व || कथा भाग ५ || शेवट भाग ||

विशालच सायलीला शोधायला जाणं. पण सायलीला शोधावं कुठं हा प्रश्न. मग आईच्या मनात नक्की काय होत?? आणि सायली अखेर भेटेल का विशालला ?? की पुन्हा विशालच प्रेम अधुरच राहील. नक्की वाचा शेवट भाग.

स्वप्न || कथा भाग ३ || SWAPN KATHA ||

वेड्या मनाने माझ्या प्रेम अंतरीचे ओळखले त्याच्या नजरेत पाहता माझेच मला मी दिसले

आई || कथा भाग ५ || Marathi Katha Kavita ||

फ्लॅटवर संध्याकाळी काम सगळं संपवून येताच तीने लगबगीने समीरला फोन लावला. "समीर !! " "शीतल !! आलीस ऑफिसमधून ?" "हो आत्ताच आले. !!" शीतलच्या आवाजातला फरक समीरला लगेच जाणवला. " शीतल !! काही प्रोब्लेम आहे का ??" शीतल क्षणभर शांत राहिली आणि म्हणाली. " नाही रे !! काही प्रोब्लेम नाहीये !! तुझी आणि त्रिशाची आठवण आली म्हणून फोन केला होता." "बरं बरं !! "

Contact Us

khajandar_yogesh@yahoo.in
+919923777633

Services

  • Home
  • About Us
  • FAQ

Quick Links

  • Privacy Policy
  • Categories
  • Copyrights Policy
  • RSS Feed

FeedBack Message

  • EMail Us
  • WhatsApp

Social

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
  • Youtube
  • Pinterest

Informaion

  • Terms
  • Photogallery
  • Blog
  • Community

Navigation

  • Menu
  • Pages
  • HTML SITEMAP

NewsLetter

Subscribe to our newsletter!

CopyRights©2022 All Rights Reserved || मराठी कथाकविता.com

Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy