“खिडकी मधुन येणारा वारा आठवणीचा गंध सोबत घेऊन येत होता. ती पलंगावर हतबल होऊन झोपली होती आणि तो तिच्या जवळच बसुन होता. शेवटच्या क्षणी तिला काय म्हणायचंय हे त्याला ऐकायच होतं. पण शब्द तिच्या ओठांवर येतंच नव्हते. बहुधा तेही रुसले असावेत कारण ती त्याची साथ अर्ध्यावरच सोडुन चालली होती. त्याच्या डोळ्यात अश्रु होते आणि मनात दुखाचा आक्रोश. पण प्रयत्न करुन ती बोलली.. ‘ मी निघुन गेल्यावर तु पुन्हा नव्याने आयुष्य सुरु कर !! माझ्या आठवणी कायमच्या पुसुन टाक !! आणि मला माफ कर मी तुला दिलेल वचन पुर्ण नाही करु शकले!! ती त्याचा हात हातात घेऊन म्हणाली. तिच्या अश्रूंचा बांध केव्हाच फुटला होता. आठवणींच्या कित्येक गोष्टी ती त्याला सांगत होती . शेवटच एकदा त्याला मनभर बोलतं होती. जीवनाच शेवटचं पानं लिहित होती.
‘तु निघुन गेल्यावर मी जगायचं तरी कोणासाठी सांग ना?’ तो तिला विचारात होता. ‘ तिच्याकडे एकटक बघत होता. ‘ माझ्या मनाचा विचार न करता तु का जातेयस !! छोट्याश्या भांडणात एक क्षण जरी नाही बोललो तरी न राहावणारा मी, तु कायमची माझ्या पासुन अशी दुर गेल्यावर मी राहु तरी कसा सांग ना?’ त्याच दुख त्याला सहन होत नव्हत. मनातल्या भावनांचा गुंता त्याला सुटत नव्हता. कित्येक गोष्टी फक्त तो सांगत होता.
पण नियतीच काही वेगळंच ठरलं होतं. क्षणात सारं संपलं होतं. तो तिला खुप काही सांगत होता. पण तिच पानं लिहुन झालं होतं. तिचा हातं तसाच त्याच्या हातात होता. खिडकीतून दिसणारा सुर्य केव्हाच मावळला होता. सावल्यांनी केव्हाच मनात घर केलं होतं. आठवणींचा अंधार आता सर्वत्र दिसत होता. तो तिला पुन्हा उठवण्याचा प्रयत्न करत होता पण आता ती त्याला कायमचं सोडुन गेली होती.
ते बोलनं ती अर्धवट सोडून गेली होती. तिच्या आयुष्याची संध्याकाळ झाली होती. पण तरीही तो बोलतंच होता. तिच्या शांत चेहर्याकडे फक्त बघत होता. मनात तिला साठवत होता अगदी कायमचं.. तीच ते शांत रुप त्याला खुप काही बोलत होतं. मिटलेल्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. आणि ते अश्रु त्याला जणु सांगतं होते..
श्वासांचा हिशोब करताना
शेवटचे दोन श्वास
“मी राखुन ठेवले होते
एक श्वास तुला पहायला
एक श्वास तुला बोलायला
मनातल काही सांगायला
तुझ्या मनातल ऐकायला
तुझा हात हाती घ्यायला
माझा हात तुझ्या हाती द्यायला
आठवणी जाग्या करायला
डोळ्यातले अश्रु पुसायला
दोन क्षण जगायला
आणि प्रत्येक श्वासांवर
तुझच नाव लिहायला
मी .. शेवटचे दोन श्वास
राखुन ठेवले होते…!!”
समाप्त
– योगेश खजानदार
READ MORE
एकट वाटेन ज्यावेळी साथ नसेल कोणाची साद घाल भावा साथ मिळेल मित्रांची मैत्री तुझी नी माझी साथ कशाला कोणाची आठवणींत आपल्या साथ होती मैत्रीची
तुझी आणि माझी मैत्री समुद्रातील लाट जणु प्रत्येक क्षण जगताना आनंदाने उसळणारी तुझी आणि माझी मैत्री ऊन्ह आणि सावली जणु सतत सोबत असताना साथ न सोडणारी
मनात माझ्या विचारात तु!! हे प्रेम सखे मझ आठवणीत तु!! क्षण हे जगावे सोबतीस तु!! नकोच चिंता मोकळ्या मनात तु!!
बास कर नाटक माणुसकीची दगडाला फासलेल्या शेंदुराची अरे ते कधी बोलत नाही देव आहे की कळत नाही अमाप पैसा लुठताना तिजोरी कुठे भरत नाही
आयुष्याचा हिशोब काही केल्या जुळेना! सुख दिल वाटुन हाती काही उरेना! दुखाच्या बाजारात दाखल कोणी होईना! गिर्हाईक मात्र त्याला काही केल्या येईना!
"अस्तित्वाच्या जाणिवेने लाचार जगन का पत्कराव स्वाभिमानाने ही तेव्हा स्वतःही का मरावं नसेल त्यास होकार मनाचा मग शांत का बसावं
वाटा शोधत होत्या मला मी मात्र स्वतःतच गुंतलो होतो बेबंद वार्या सोबत उगाच फिरत बसलो होतो वळणावर येऊन सखी ती सोबत येण्यास तयार होती मी मात्र परक्याच्या घरात उगाच भांडत…
तुझी साथ हवी होती मला सोबत चालताना वार्या सारख पळताना पावसात भिजताना आणि ऊन्हात सावली पहाताना!! तुझी साथ हवी होती मला दुःखात रडताना आनंदाने हसताना
मला माझ्यात पाहताना तु स्वतःत एकदा शोधुन बघ डोळ्याच्या या पापण्यांन मध्ये मला एकदा सहज बघ मी तिथेच असेन तुझी वाट पहात मला एकदा भेटुन बघ मनातल्या भावनांना ओठांवरती आणुन…
कदाचित त्या वाटा ही तुझीच आठवण काढतात तुझ्या सवे चाललेल्या क्षणास शोधत बसतात पाऊलखुणा त्या मातीतून भुतकाळाची साक्ष देतात एकट्या या मुसाफिरास
जुने मित्र आता हरवलेत कोणी खुप busy झाले तर कोणी खुप भाव खाऊ लागलेत खरंच जुने मित्र आता हरवलेत वेळ पाहुन आता भेटु लागले भेटुनही काही मित्र आता
बार्शी तुझा रस्त्यावर भरोसा हाय काय!!हाय काय!! कित्येक जीवाची पर्वा इथे नाही!! नाही!! खड्ड्यात रस्ता दिसत नाही!! नाही!! तरीही कोणी ऐकत नाही! नाही!! बार्शीचा रस्ता लई भारी!! भारी!!
कभी पंछियों से पूछना गिरना क्या होता है तेज हवाओं में कभी उड़ना क्या होता है हवा भी रोक सके ना उसे ऐसा होसला क्या होता है कभी पेड़ से…
मनातल्या तुला लिहिताना जणु शब्द हे मझ बोलतात कधी स्वतः कागदावर येतात तर कधी तुला पाहुन सुचतात न राहुन स्वतःस शोधताना तुझ्या मध्येच सामावतात
चकली गोलच का करायची म्हणून पोट्टे विचारत होते दिवाळी जवळ आली आता म्हणून घरात फराळ बनत होते शंकरपाळी मध्ये शंकर कुठे आहे पोट्टे उगाच शोधत होते
मी बंदिस्त आणि शांत जरी माझ्या मनाची शांती अटळ आहे या बंधांचे आज जणु खूप तुझ्यावर उपकार आहे हसून घे वेड्या आज तुझा जयजयकार आहे
शोधायचं आहे आज माझेच एकदा मला कधी कोणत्या वळणावर भेटायचं आहे मला
वाऱ्यास पुसूनी ती वाट पुढची त्या सावलीतला मी एक पांथस्थ हवी थोडी विश्रांती नी घोटभर पाणी पुढच्या प्रवासास मी आहे सज्ज
अबोल या नात्याची बोलकी एक गोष्ट आहे मनातल्या भावनेस शब्दांचीच एक साथ आहे
सुरुवात होती या जगात माझी चूक नी बरोबर काही माहीत नव्हते माणुसकीच्या बुरख्यात येऊन राक्षस मला दिसले नव्हते
Related