Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » कथा

दृष्टी || कथा भाग ४ || Marathi sundar katha ||

Category कथा
दृष्टी || कथा भाग ४ || Marathi sundar katha ||

Content

  • भाग ४
  • क्रमशः
Share This:

भाग ४

“दृष्टीला उद्या घरी आणायचं या विचारात रात्र निघून गेली. नव्या दिवसाने नवी दिशा या आयुष्याला दिली. क्षितिज आज नेहमी पेक्षा जरा लवकरच उठला होता. सकाळी लवकर आवरून, सर्व कामे पूर्ण करून, दृष्टीला आणायला जायचं या विचारात तो होता. आईच्याही हे लक्षात आलं होत. त्याला आवरताना पाहून ती मध्येच बोलते.

“नाष्टा तरी करणार आहेस की नाही ??”आई मिश्किल हसते.
“हो आई !! करणार आहे !! ” तिच्याकडे हसत पाहत तो म्हणाला.
“ये मग !! तुझ्या आवडीचे मस्त दडपे पोहे केलेत!!”
“मस्तच !!” क्षितिज खुर्चीवर बसत म्हणाला.
“घे ! कधी जाणार आहेस दृष्टीला घरी घेऊन यायला !!!!”
“एक काम आटोपलं की लगेच जाणार आहे !!”
“तिला फोन करून सांगितलंस की नाही ??”
“नाही !! Surprise .!!” क्षितिज गालात हसत म्हणाला.
“छान !!” आई त्याला अजून पोहे वाढत म्हणते.
“वाह काय !! मला टेन्शन आलंय मालती ताईंच!!! त्या परवानगी देतील की नाही माहीत नाही !!”
“देतील रे !! आणि काही तसे म्हणाल्या तर फोन कर मला !! मी सांगेन हवं तर !!”
“हो चालेल!!” क्षितिज हसत म्हणाला.

डिश मधले पोहे संपवून क्षितिज आता बाहेर निघाला होता. त्यालाही दृष्टीला भेटायची ओढ लागली होती.पण कित्येक वेळ तो कामातच गुंतून राहिला. केव्हा काम संपवून दृष्टीला आणायला जातो आहे असं त्याला वाटायला लागलं होतं. अखेर कित्येक वेळ काम केल्यानंतर तो आश्रमात जायला निघाला. मोबाईल पाहतो तर आश्रमातून कित्येक फोन त्याला आले होते. त्याच्या मनात अनेक विचार आले. आश्रमातून इतके कॉल्स कसे काय त्याला काहीच कळत नव्हतं. अखेर तो घाईघाईत आश्रमात पोहचला. समोर मालती ताई उभ्याच होत्या. त्यांच्या जवळ जात क्षितिज बोलू लागला.

“मालती ताई !! आश्रमातून इतके कॉल्स !! सगळं ठीक आहे ना ??” क्षितिज मनात आलेल्या कित्येक विचारांना शांत करत बोलू लागला.
“कुठे होतास तू ?? तुला किती कॉल्स केले !! एकही रिसिव्ह केला नाहीस तू !! अरे दृष्टी !!”
“काय झालं दृष्टीला??” क्षितिज मध्येच बोलला.
“अरे दृष्टी हा आश्रम सोडून गेली रे !! ” मालती ताई डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाल्या.
“आश्रम सोडून ?? कुठे !! आणि तुम्ही कोणीच अडवल कस नाही तिला !! पण का सोडून गेली ती ???”

मालती ताई भानावर येत बोलू लागल्या. क्षितिजला झाली हकीकत सांगू लागल्या.
“काल तू गेल्यावर दृष्टीचे आई बाबा कित्येक वर्षांनी तिचा शोध घेत आले होते!! त्यांनी दृष्टी त्यांची मुलगी आहे अस आश्रमातल्या सगळ्या व्यवस्थापकांना पटवून दिलं !! आणि तिचा विरोध असतानाही तिला ते सोबत घेऊन गेले !!”
“सोबत घेऊन गेले ?? असे कसे घेऊन गेले?? इतक्या वर्षांनी कसे काय आले ?? आणि तुम्ही मला आता हे सांगताय !! कालच फोन का केला नाही ??” क्षितिजच्या मनात कित्येक विचारांचे वादळ उठत होते.
“काल सगळं हे इतकं अनपेक्षित घडत होतं की दृष्टीला सांभाळाताना तुला फोनच करता आला नाही !!!” मालती ताई क्षितिजला सावरत म्हणाल्या.
“नाही !! खोटंय हे सगळं !! कोण कुठले लोग !! त्याच्या सोबत असच पाठवून दिलं !! मी दृष्टीला फोन लावतो !! तिला जाब विचारतो !! मला न सांगता तू गेलीस तरी कशी ते !! ” क्षितिज खिशातून मोबाईल बाहेर काढू लागला.
“त्याचा काही उपयोग नाहीये !! बंद लागतोय तिचा फोन !! “मालती ताई मध्येच म्हणाल्या.
“कुठे घेऊन गेलेत तिला !! सांगितलं असेल ना त्यांनी ??”
“नाही !! अस काहीच बोलले नाहीत ते !! “
“मालती ताई हे काय झालं !! आज तिला मी घरी घेऊन जायला आलो होतो!! आणि ती मला न सांगता निघून गेली!! अस कस करू शकते ती !!” क्षितिज आता डोळ्यातल्या अश्रूंना थांबवू शकत नव्हता.
“मला तिच्याबद्दल काहीही कळाल!! ती कुठे आहे !! तर मी तुला फोन करून सांगेन !! तू पण तिला सारख कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न कर !! ती जोपर्यंत सुखरूप आहे, हे कळत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाहीये !! ” मालती ताई क्षितिजला सावरत म्हणाल्या.
“पण तरीही!! मला अजूनही विश्वास बसत नाहीये की ती मला अस सोडून गेली ते !!” क्षितिज मालती ताईंना मनातलं बोलू लागला.
“तिने केला प्रयत्न !! पण ते सगळं एवढं अनपेक्षित होत की तिला ते सावरून घेता नाही आल. शेवटी जाताना ती एकच म्हणाली, क्षितिजला सांगा मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही !! मला तुझ्यासोबत घेऊन चल !! अगदी कायमच !!” मालती ताई क्षितिजला सगळं काही सांगत होत्या.

क्षितिज हताश होऊन परत चालला होता.त्याच्या मनात कित्येक विचारांचं काहूर माजलं होतं. दृष्टीचा तो सुंदर चेहरा त्याच्या नजरे समोरून हटतच नव्हता.गाडीच्या त्या वेगात त्याच्या विचारांच्या वेगालाही मर्यादा राहिली नव्हती. दिशाहीन वादळा सारखी त्याची अवस्था जणू झाली होती.

“एखादी व्यक्ती मनात घर करून बसली, की तिच्यासाठी काहीही करावं असं हे मनच त्याला सांगत!! ती व्यक्ती विसरून गेली असेल तर आठवणींच्या विश्वात पुन्हा त्याला जिवंत करावं असं हे मन त्याला सांगत !! त्याच चित्र काढावं अस की त्याचे रंग आपण बनावे अस हे मनच सांगत !! मग हे मन या आठवणीतल्या त्या व्यक्तीला चारही दिशा शोधावं असंही सांगत !! पण तरीही ती व्यक्ती शोधूनही सापडत नसेल तर काय करावं !! हे मन मात्र ते सांगत नाही !! त्या आठवणी कश्या पुसाव्या तेही सांगत नाही !! माझी दृष्टी माझ्यापासून दूर गेली !! कुठे गेली ?? कुठे असेल ?? काही माहीत नाही !! चारही दिशा मी तिला शोधलं पण मला ती काही सापडत नाही !! अगदी कालपर्यंत जीच्यासाठी काहीही करायला मी तयार आहे !! तो हतबल होऊन बसला आहे !!” क्षितिज आपल्याच विचारांच्या तंद्रीत बसून राहतो. आश्रमासमोर ,गाडीतच.

अखेर कित्येक वेळ तसाच बसून राहिल्या नंतर क्षितिज घरी जायला निघतो. त्याचे मन मात्र त्या आश्रमातून निघेना. दृष्टीला अजूनही ते मन तिथेच शोधत होते. जड पावलांनी तो जायला निघाला, घरी जायला उशीर झाला. घराचे दार उघडताच आई समोरच उभी होती. दृष्टी येणार म्हणून तिने सगळी तयारी केलेली होती. क्षितिजला एकट्याला पाहून आई विचारते,

“एकटाच आलास !! दृष्टी नाही आली ??” आई प्रश्नार्थक नजरेने पाहते.
“नाही !” क्षितिज थोड तुटकच बोलतो.
” का रे ?? मालती ताईंनी परवानगी दिली नाही का ?? तुला म्हटलं होत मी तसं काही असेल तर मला फोन कर म्हणून !! मी सांगितलं असत त्यांना !!” आई क्षितिजकडे बघत म्हणते. काहीतरी झालं आहे याची जाणीव तिला होते.
“नाही !! तसं काही नाही!!”
“काय झालं क्षितिज ?? काही सांगशील का ??”
“आई दृष्टी आश्रम सोडून निघून गेली !! “
“आश्रम सोडून निघून गेली ?? कुठे ?? आणि का ??”
“काल कित्येक वर्षांनंतर तिचे आई बाबा तिला शोधत आले होते म्हणे !! त्याच्या सोबत ती निघून गेली!! ” क्षितिज समोरच्या खुर्चीवर बसत म्हणाला.
“असे कसे आले आई बाबा ?? आणि कोण कुठली माणसं !! आश्रमातल्या लोकांनी विश्वास ठेवलाच कसा??”
“त्यांनी त्याच्याकडे काही कागदपत्र दाखवली !! तिची एक जन्मखून सांगितली !! त्यानंतर त्याची खात्री पटली आणि त्यांनी तिला जाऊ दिल !!” क्षितिज बसल्या आवाजात सार काही सांगू लागला.
“जाताना तिला तुझी एकदाही आठवण आली नाही ??”
“तिचा विरोधच होता म्हणे !! मालती ताई सांगत होत्या !! पण अखेर नाईलाज झाला !! आणि ती गेली त्यांच्यासोबत !!कुठे गेली !! आता सुखरूप आहे की नाही !! काहीही माहीत नाही !! “
“तिचे आई वडील मिळाले याचा आनंद करावा की दुःख काहीच कळत नाहीये !! पण ती तुला अशी सोडून नाही जाणार !! तू नकोस असा हताश होऊस !!” आई क्षितिजला धीर देत म्हणाली.
” मला तर हे सगळं खोटं आहे अस वाटतंय !!” क्षितिज स्वतःला सावरत म्हणाला.

क्षितिज आई सोबत कित्येक वेळ आपल्या मनातलं बोलून अखेर आपल्या खोलीत आला. कित्येक वेळ आज झालेल्या गोष्टी आठवून विचार करत बसला. दृष्टी आज अचानक कुठे निघून गेली हे त्याला काहीच केल्या कळतं नव्हतं. त्याने कित्येक वेळा तिचा फोन लावून पाहिला पण अजूनही बंदच लागत होता. आश्रमात विचारून पाहिलं तिथेही ती कुठे गेली काहीच कळतं नव्हतं.

रात्र अशीच गेली, रात्रभर क्षितिज झोपलाच नाही. दृष्टीच्या आठवणींनी त्याला पुरत वेडून घेतलं होत. “तिला दृष्टी नाही, तरी ती माझ्या नजरेतून ही दुनिया पाहत होती. पण आता न सांगता निघून गेली , मग आता ही दुनिया ती कशी पाहत असेल ??दृष्टी !! कुठे आहेस तू ?? तुझ्या आठवणी खूप छळतात मला !! तुलाही माझी आठवण येत असेलच ना? कुठे आहेस ?? कशी आहेस ?? ” तुझ्या आठवांचा हा पाऊस सतत मला भिजवत आहे.”

“हरवून गेल्या दिशांना
व्यर्थ उगाच शोधणे!!
डोळ्यातल्या अश्रूंना
तुझीच ओढ लागणे!!

व्यर्थ सारी स्वप्ने ही
एकांत मनी तो दिसणे!!
तुझ्या आठवांच्या जगात
उगाच फिरुनी येणे!!

हात तुझा हाती असावा
क्षणाचे हे बोलणे !!
आयुष्यभराची आठवण तू
हेच खरे जगणे !! “

क्षितिज कित्येक वेळ त्या अंधारात त्या खोलीत बसून राहिला.

क्रमशः

दृष्टी || कथा भाग ३ ||
दृष्टी || कथा भाग ५ ||

Yogesh Khajandar

Author || Content Writer || Blogger ||

Tags Marathi Katha Marathi love stories Marathi prem katha Marathi Stories Poems And Much More!!

RECENTLY ADDED

वर्तुळ || कथा भाग १७ || पुढचा प्रवास || शेवट भाग ||
वर्तुळ || कथा भाग १७ || पुढचा प्रवास || शेवट भाग ||
वर्तुळ || कथा भाग १६ || खरं प्रेम ||
वर्तुळ || कथा भाग १६ || खरं प्रेम ||
वर्तुळ || कथा भाग १५ || संगत ||
वर्तुळ || कथा भाग १५ || संगत ||
वर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||
वर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

TOP POST’S

Dinvishesh

दिनविशेष २१ जानेवारी || Dinvishesh 21 January ||

१. ब्रिटीश कमुनिस्ट वृत्तपत्र "डेली वर्कर" वर बंदी घातली. (१९४१) २. मेघालय आणि मणिपूर यांना राज्याचा दर्जा देण्यात आला. (१९७२) ३. थोरले माधवराव पेशवे यांनी पेशवाईची सूत्रे वयाच्या सोळाव्या वर्षी हाती घेतली. (१७६१) ४. जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पार्टीने सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या. (१९५२) ५. मिझोरम जो आसामचा भाग होता तो भारतीय केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषीत करण्यात आला. (१९७२)
Dinvishesh

दिनविशेष २१ जुलै || Dinvishesh 21 July ||

१. अलेक्झांडर केरेंस्की हे रशियाचे पंतप्रधान झाले. (१९१७) २. इंडोनेशिया मध्ये पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. (१९४७) ३. स्पेनमध्ये दोन प्रवासी गाड्यांमध्ये झालेल्या अपघातात ७०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९७२) ४. संजिवा रेड्डी हे बिनविरोध भारताचे ६वे राष्ट्रपती बनले. (१९७७) ५. सिरीमाओ बंदरणाके या श्रीलंकेच्या पंतप्रधान झाल्या. जगातील पहिल्या महिला पंतप्रधान त्या झाल्या. (१९६०)
man and woman sitting on grass field

तुझ्याचसाठी || TUJYACHSATHI MARATHI KAVITA ||

तुझ्याच या वाटेवरती, तुलाच न भेटावे तुझ्याचसाठी झुरावे मी, आणि तुलाच न कळावे सांगू तरी कसे नी काय, मनास कसे समजवावे राहूनही न राहता मग , नकळत तुला पहावे
Dinvishesh

दिनविशेष ४ फेब्रुवारी || Dinvishesh 4 February ||

१. श्रीलंका या देशाला स्वातंत्र्य मिळाले. (१९४८) २. जापनीज सैन्याने हर्बिन काबिज केले. (१९३२) ३. मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटची स्थापना केली. (२००४) ४. तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला पुन्हा स्वराज्यात सामील केला. पुढे तो किल्ला सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला. (१६७०) ५. पहिले इलेक्ट्रिकल टाइपव्राईटर विक्रीस उपलब्ध झाले. (१९५७)
श्री कालभैरवाष्टक || Ashtak || Devotional ||

श्री कालभैरवाष्टक || Ashtak || Devotional ||

श्री गणेशाय नमः । श्री कालभैरवाय नमः । श्री शिवांशपूर्ण आदि मध्य अंत ज्या नसे, बाह्य जया नसे उपाधि चार गर्जती असे । निर्गुणा निरंकुशा निरंजना निरंतरा, श्री हरेश्र्वराधिनाथ कालभैरवा स्मरा ॥ १ ॥

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest