Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » मराठी लेख

तो तसा तर मीपण तसा || MANATLE SHABD ||

Category मराठी लेख
तो तसा तर मीपण तसा || MANATLE SHABD ||
Share This:

‘तु तसा वागलास म्हणुन मीही तसाच वागेन!!’ या गोष्टीमुळे कित्येक नाती तुटुन जातात.मध्यंतरी माझ्याच बद्दल असे अनुभव आले त्यावरून काही ..

एक व्यक्ती आपल्याशी वाईट वागली म्हणुन तिचा तिरस्कार करत बसण्याची खरंच गरज आहे का ? की सोडुन विसरून जावं जे झालं ते, पण मनातला राग तिरस्कार काही शांत बसु देत नाही. म्हणुनच मी कित्येक वेळ पुस्तक वाचत बसलो. तासनतास पुस्तक वाचल्यावर ज्या गोष्टीचा राग आला त्या गोष्टीवर मी विचार करायला लागलो आणि खरंच ती गोष्ट इतकी महत्वाची नव्हतीच की आपण जशास तसे वागु. अखेर सर्व विसरुन मी माझ्या कामाला लागलो. सांगायचा मुद्दा हाच की कोणत्या गोष्टीला किती महत्व द्याव ते. जशास तसे वागण्यापेक्षा मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे पसंत केलं.

परवाच एका मित्राच त्याच्या मित्रांशी भांडन झालं खरंतर कारण कोणी तिसरीच व्यक्ती होती. खुप वेळ भांडल्यावर त्यांना लक्षात आलं की खरंच आपण ज्या गोष्टीमुळे भांडतोय त्यात काही तथ्य आहे का? ज्या व्यक्तीमुळे भांडण झालं ती व्यक्ती ज्यावेळी समोर आली तेव्हा, ‘तो मला अस बोलला म्हणुन मी त्याला तस म्हणालो!!’ या एका वाक्यावर येऊन थांबली. म्हणजेच काय तर ‘तु तसा वागलास म्हणुन मीही तसाच वागेन !!’ दोघांनीही खुप विचार केला आणि भांडण किती निरर्थक होतं हे त्याना कळालं.

‘तु बोलत नाहीस म्हणुन मीही बोलणार नाही, तो आला नाही म्हणुन मीही जाणार नाही, या सगळ्यातुन फक्त आपलाच कोतेपणा दिसतो हे खरंच सांगावं लागत का.? कोण कसं वागतं आपल्याशी त्यावर आपण आपलं वागणं ठरवावं का? तर मी म्हणेन मुळीच नाही. आपण का बदलावं स्वतःला. आपण कस वागावं ते यांनी का ठरवावं? म्हणजे कोणी आपल्याशी वाईटच वागत असेल तर अशा व्यक्तीला कितपत प्रतिसाद द्यायचा हे आपल्यावरंच असतं अखेर.

मध्यंतरी माझंही असंच झालं एका व्यक्तीशी बोलण्याच्या नादात आपलीच विचारांची पातळी कमी करतोय असं मला जाणवून आलं. म्हणजे झालं काय की जर त्या व्यक्तीला चांगलं आणि वाईट या गोष्टीतला फरकच जर कळत नसेन तर बोलुन तरी काय फायदा असं वाटु लागलं. या काळात मला एक गोष्ट जाणवली माझ्या विचारांची दिशा वाईट विचारांकडे जातेय. आपण कोणालातरी काहीतरी बोलण्याच्या नादात विचारांची पातळी खालावतेय हे स्पष्ट जाणवुन आलं. शेवटी ती व्यक्ती आणि ते विचार याच्यावर खरंच विचार करण्याची वेळ आली हे जाणवलं. आणि आपण कोणासाठी का बदलावं हा निष्कर्ष निघाला. शेवटी ती व्यक्ती कशी वागली किंवा सर्व कळूनही नकळल्याचे सोंग त्या व्यक्तीने केले याचा विचार न करता मी तो विषय आटोपला.

आणि अखेर एक ठरवलं की ‘तु कसाही वाग माझ्याशी वाईट , चांगलं मी मात्र माझ्या स्वभावात आहे, माझ्या विचारांना पटेन तसंच वागणार. एखेर नातं हे ओढुन ताणुन टिकत नसतं , पटलं तर रहा नाहीतर जा असही नसतं. तर नातं हे समजुन वागण्यात असतं. ती माझ्यावर चिढली म्हणून मीपण तिच्यावर चिढणार, तो माझ्याशी खोट बोलला म्हणुन मीपण बोलणार, ती माझ्याशी बोललीच नाही म्हणुन मीपण नाही बोलणार या सगळ्यात फक्त आपल्या मनातली संकुचित भावना वाढते आणि तो अस तर मी अस या गोष्टी होतात. पण मी म्हणेन तो किंवा ती कसे ही असो मी असा आहे माझ्या विचारांशी मतांशी, आणि याला महत्व असतं. कारण नात्यात स्वतःच मत फार महत्त्वाचं असतं.

अखेर मी एवढंच म्हणेन तो असा म्हणुन मीपण तसा यातुन बाहेर येऊन खरंच नातं जपलं पाहिजे. कोणी अबोल राहिले तर बोलले पाहिजे, कोणी उगाच भांडले तर त्याच्याशी भांडायचे नाही तर चांगले बोलले पाहिजे. . .. तरंच नाती टिकतात .. क्षणासाठी तो असा तर मीपण तसा यात आयुष्यभराची नाती विरुन जाऊ नयेत हे पाहिलं पाहिजे…

✍योगेश खजानदार

Tags तो तसा तर मीपण तसा Marathi articles Marathi Blog marathi lekh

RECENTLY ADDED

दुपारचं उन्ह || मराठी लेख || Marathi ||
दुपारचं उन्ह || मराठी लेख || Marathi ||
gold buddha figurine in gold and red floral dress
गणपतीची पट्टी || Ganapati Utsav ||
woman in black long sleeved shirt
तुमच्या आयुष्याचे निर्णय कोण घेत ? तुम्ही की दुसरं कोण ? || Marathi Lekh ||
brown framed eyeglasses on a calendar
वाढदिवस || तिथी की तारीख || Marathi ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

TOP POST’S

a couple wearing brown leather jacket

प्रेम माझं || HRUDAYSPARSHI KAVITA ||

प्रेम म्हणतं मी ते व्यक्त करायला जावं हातात गुलाबाचं फुल देताना नेमकं तिच्या बाबांनी पहावं बाबा हाच आला होता तिने अस का म्हणावं आणि पुढचे काही दिवस मग एका डोळ्यानेच पहावं
Dinvishesh

दिनविशेष ११ सप्टेंबर || Dinvishesh 11 September ||

१. आझाद हिंद सेनेने जण गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले. (१९४२) २. World Wildlife Fund ची स्थापना करण्यात आली. (१९६१) ३. भारतीय सैन्याने लाहोर जवळ बुर्की हे गाव आपल्या ताब्यात घेतले. (१९६५) ४. महात्मा गांधींनी पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत अहिंसेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनात सत्याग्रह ही संकल्पना वापरली. (१९०६) ५. इराक आणि सऊदी अरेबियाने नाझी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. (१९३९)
green white and red flag under white clouds

दिनविशेष १५ ऑगस्ट || Dinvishesh 15 August ||

१. ब्रिटीश सत्तेतून भारत देश स्वतंत्र झाला. (१९४७) २. फ्लोरिडा मधील पनामा शहराची स्थापना कंक्विस्ताडोर पेड्रो अरियास डविल्ला यांनी केली. (१५१९) ३. पंडीत जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. (१९४७) ४. अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले. (१९७१) ५. भारतात पहिल्यांदाच दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली. (१९८२)
श्रीगुरूचरित्र अध्याय १८

श्रीगुरुचरित्र अध्याय २१ || Gurucharitr Adhyay 21 ||

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ सिद्ध म्हणे नामधारका । ब्रह्मचारी तो कारणिका । उपदेशिले ज्ञानविवेका । तया प्रेतजननीसी ॥ १ ॥ ब्रह्मचारी म्हणे नारी । मूढपणें दुःख न करी । कवण वाचला असे स्थीरी । या संसारी सांग मज ॥ २ ॥
श्रीगुर्वाष्टकम् || Devotional ||

श्रीगुर्वाष्टकम् || Devotional ||

शरीरं सुरुपं तथा वा कलत्रं, यशश्र्चारु चित्रं धनं मेरुतुल्यम् । हरेरंघ्रिपद्मे मनश्र्चेन्न लग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ १ ॥

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest