Skip to content

  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • चित्रबद्ध
  • कॅटेगरीज
  • संपर्क

मुखपृष्ठ » मराठी लेख » तो तसा तर मीपण तसा || MANATLE SHABD ||

तो तसा तर मीपण तसा || MANATLE SHABD ||

तो तसा तर मीपण तसा || MANATLE SHABD ||

0

‘तु तसा वागलास म्हणुन मीही तसाच वागेन!!’ या गोष्टीमुळे कित्येक नाती तुटुन जातात.मध्यंतरी माझ्याच बद्दल असे अनुभव आले त्यावरून काही ..

एक व्यक्ती आपल्याशी वाईट वागली म्हणुन तिचा तिरस्कार करत बसण्याची खरंच गरज आहे का ? की सोडुन विसरून जावं जे झालं ते, पण मनातला राग तिरस्कार काही शांत बसु देत नाही. म्हणुनच मी कित्येक वेळ पुस्तक वाचत बसलो. तासनतास पुस्तक वाचल्यावर ज्या गोष्टीचा राग आला त्या गोष्टीवर मी विचार करायला लागलो आणि खरंच ती गोष्ट इतकी महत्वाची नव्हतीच की आपण जशास तसे वागु. अखेर सर्व विसरुन मी माझ्या कामाला लागलो. सांगायचा मुद्दा हाच की कोणत्या गोष्टीला किती महत्व द्याव ते. जशास तसे वागण्यापेक्षा मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे पसंत केलं.

परवाच एका मित्राच त्याच्या मित्रांशी भांडन झालं खरंतर कारण कोणी तिसरीच व्यक्ती होती. खुप वेळ भांडल्यावर त्यांना लक्षात आलं की खरंच आपण ज्या गोष्टीमुळे भांडतोय त्यात काही तथ्य आहे का? ज्या व्यक्तीमुळे भांडण झालं ती व्यक्ती ज्यावेळी समोर आली तेव्हा, ‘तो मला अस बोलला म्हणुन मी त्याला तस म्हणालो!!’ या एका वाक्यावर येऊन थांबली. म्हणजेच काय तर ‘तु तसा वागलास म्हणुन मीही तसाच वागेन !!’ दोघांनीही खुप विचार केला आणि भांडण किती निरर्थक होतं हे त्याना कळालं.

‘तु बोलत नाहीस म्हणुन मीही बोलणार नाही, तो आला नाही म्हणुन मीही जाणार नाही, या सगळ्यातुन फक्त आपलाच कोतेपणा दिसतो हे खरंच सांगावं लागत का.? कोण कसं वागतं आपल्याशी त्यावर आपण आपलं वागणं ठरवावं का? तर मी म्हणेन मुळीच नाही. आपण का बदलावं स्वतःला. आपण कस वागावं ते यांनी का ठरवावं? म्हणजे कोणी आपल्याशी वाईटच वागत असेल तर अशा व्यक्तीला कितपत प्रतिसाद द्यायचा हे आपल्यावरंच असतं अखेर.

मध्यंतरी माझंही असंच झालं एका व्यक्तीशी बोलण्याच्या नादात आपलीच विचारांची पातळी कमी करतोय असं मला जाणवून आलं. म्हणजे झालं काय की जर त्या व्यक्तीला चांगलं आणि वाईट या गोष्टीतला फरकच जर कळत नसेन तर बोलुन तरी काय फायदा असं वाटु लागलं. या काळात मला एक गोष्ट जाणवली माझ्या विचारांची दिशा वाईट विचारांकडे जातेय. आपण कोणालातरी काहीतरी बोलण्याच्या नादात विचारांची पातळी खालावतेय हे स्पष्ट जाणवुन आलं. शेवटी ती व्यक्ती आणि ते विचार याच्यावर खरंच विचार करण्याची वेळ आली हे जाणवलं. आणि आपण कोणासाठी का बदलावं हा निष्कर्ष निघाला. शेवटी ती व्यक्ती कशी वागली किंवा सर्व कळूनही नकळल्याचे सोंग त्या व्यक्तीने केले याचा विचार न करता मी तो विषय आटोपला.

आणि अखेर एक ठरवलं की ‘तु कसाही वाग माझ्याशी वाईट , चांगलं मी मात्र माझ्या स्वभावात आहे, माझ्या विचारांना पटेन तसंच वागणार. एखेर नातं हे ओढुन ताणुन टिकत नसतं , पटलं तर रहा नाहीतर जा असही नसतं. तर नातं हे समजुन वागण्यात असतं. ती माझ्यावर चिढली म्हणून मीपण तिच्यावर चिढणार, तो माझ्याशी खोट बोलला म्हणुन मीपण बोलणार, ती माझ्याशी बोललीच नाही म्हणुन मीपण नाही बोलणार या सगळ्यात फक्त आपल्या मनातली संकुचित भावना वाढते आणि तो अस तर मी अस या गोष्टी होतात. पण मी म्हणेन तो किंवा ती कसे ही असो मी असा आहे माझ्या विचारांशी मतांशी, आणि याला महत्व असतं. कारण नात्यात स्वतःच मत फार महत्त्वाचं असतं.

अखेर मी एवढंच म्हणेन तो असा म्हणुन मीपण तसा यातुन बाहेर येऊन खरंच नातं जपलं पाहिजे. कोणी अबोल राहिले तर बोलले पाहिजे, कोणी उगाच भांडले तर त्याच्याशी भांडायचे नाही तर चांगले बोलले पाहिजे. . .. तरंच नाती टिकतात .. क्षणासाठी तो असा तर मीपण तसा यात आयुष्यभराची नाती विरुन जाऊ नयेत हे पाहिलं पाहिजे…

✍योगेश खजानदार

Tags तो तसा तर मीपण तसा Marathi articles Marathi Blog marathi lekh

READ MORE

गणपतीची पट्टी || Ganapati Utsav ||
तुमच्या आयुष्याचे निर्णय कोण घेत ? तुम्ही की दुसरं कोण ? || Marathi Lekh ||
वाढदिवस || तिथी की तारीख || Marathi ||
स्वातंत्र्य दिनी व्हावे चिंतन मनन || Indian Independence Day ||

TOP POEMS

विरह || Virah|| Marathi Kavita ||

साऱ्या साऱ्या रित्या केल्या कालच्या आठवणीं सांग सांग काय सांगू तुझ्या विन न उरे काही

शब्द व्हावे बोलके || LOVE POEM || KAVITA ||

ओठांवरच्या शब्दांना मार्ग हवे मोकळे तु आहेस जवळ पण, शब्द व्हावे बोलके हे प्रेम नी भावना नकळत जे घडते अबोल त्या बंधनात शब्द व्हावे बोलके

एक जिद्द म्हणजे तरी काय ??|| Motivational quotes|| Must Read

ध्येयवेड्या माणसास नकोच खंत कोणती !! मार्ग एक चालताच , नसावी त्यास भीती !! प्रयत्न जणू असे करावे, हरण्याची नसावी गिनती !! रुतेल तो काटा अपयशाचा, पण मन नसेल दुःखी !!

चाहूल || CHAHUL KAVITA ||

चाहूल कोणती ती आज मनास माझ्या आठवणीतल्या त्या घरास ठोठावले ते दार क्षणांचे जेव्हा कोण आले हे दारात ओळखीचा वाटे का आवाज साद मझ का बोलावण्यास मी पाहिले पुन्हा वळून जेव्हा कोणीच नव्हते का दारात

शेवटचं एकदा बोलायचं होत || LOVE POEM || MARATHI ||

"शेवटचं एकदा मला, बोलायचं होत!! प्रेम माझ तुला, सांगायच होत!! सोडुन जाताना मला, एकदा पहायच होत!! डोळ्यातली आसवांना, बोलायचं होत!!

एक वचन || EK VACHAN || MARATHI PREM KAVITA ||

तिच्या मनात खुप काही आहे, पण त्याच्या सहवासात तिला काही सुचतच नाही. क्षणात खूप जगतेय ती त्याच्यासवे आणि मग अलगद आयुष्यभराची साथ मागते आहे ..!! नकळत तेव्हा क्षणही थांबले आहेत ..!! .. मनातल्या तिच्या भावना जणू म्हणतात ..

TOP STORIES

सहवास || कथा भाग १ || MARATHI LOVE STORIES ||

सरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत पण अखेर रागचं मनात का ??

बंगला नंबर २२ || कथा भाग २ || सरप्राइज || मराठी भयकथा ||

"प्रिया !! एक मिनिट हा !! मी तुला नंतर कॉल करतो !! " "अरे !! काय झालं !! श्रीधर !! श्रीधर !! " प्रिया बोलतं राहिली.

शर्यत || कथा भाग ३ || Sharyat Marathi Story ||

"भाडकाव माझं काम घेतो !! तुला तर आता जित्ता नाही सोडत !!" सखा कसाबस उठायचा प्रयत्न करतो. पण पुन्हा शिरपा त्याच्या हातावर लाथ मारतो. सखा जोरात खाली पडतो. "साहेबांच इतक्या वर्षांचा जवळचा माणूस आहे मी !! आणि काल एक दिवस नव्हतो तर तू कुठून आला र !!" सखा हात जोडून उभा राहायचा प्रयत्न करतो. "पर !! मला तुमचं काही माहीत नव्हतं शिरपा ! " "आता कळल ना !! निघायचं आता !! पुन्हा जर दुकानात दिसला तर जिता नाही ठेवायचो तुला !!" "पण साहेब ?? आप्पा !!"

आई || कथा भाग ७ || मराठी कथा || Story ||

दिवसभराच्या कामानंतर शीतलला कधी एकदा फ्लॅटवर येते आहे अस झालं होत. ती ऑफिसमधून लगबगीने येते. सगळी कामे आवरून पुन्हा उद्याच्या प्रेझेंटेशनची तयार करू लागते. रात्रीच जेवण करण्याची सुद्धा आठवण तिला येत नाही. कामात व्यस्त असतानाच समीरचा फोन येतो

बंगला नंबर २२ || कथा भाग ५ || वासना || मराठी कथा ||

"काय हवंय तुम्हाला ??" "मला तू हवी आहेस ??" देशमुख साहेब पुढे येत म्हणाला. "अस काय करताय साहेब तुम्ही !! प्लिज तुम्ही इथून जा !!"

स्वप्न || कथा भाग २ || MARATHI STORIES ||

घराचा दिवा पोरगं जणू घराची वात पोरगी असते घरात सारे शिकले तर घराची प्रगती होत असते

Contact Us

khajandar_yogesh@yahoo.in
+919923777633

Services

  • Home
  • About Us
  • FAQ

Quick Links

  • Privacy Policy
  • Categories
  • Copyrights Policy
  • RSS Feed

FeedBack Message

  • EMail Us
  • WhatsApp

Social

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
  • Youtube
  • Pinterest

Informaion

  • Terms
  • Photogallery
  • Blog
  • Community

Navigation

  • Menu
  • Pages
  • HTML SITEMAP

NewsLetter

Subscribe to our newsletter!

CopyRights©2022 All Rights Reserved || मराठी कथाकविता.com

Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy