Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • चित्रबद्ध
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क

मुखपृष्ठ » मराठी लेख » तुमच्या आयुष्याचे निर्णय कोण घेत ? तुम्ही की दुसरं कोण ? || Marathi Lekh ||

तुमच्या आयुष्याचे निर्णय कोण घेत ? तुम्ही की दुसरं कोण ? || Marathi Lekh ||

तुमच्या आयुष्याचे निर्णय कोण घेत ? तुम्ही की दुसरं कोण ? || Marathi Lekh ||

आयुष्याच्या एकातरी पायरीवर आपण नकळत अडकून जातो, ना पुढे जाण्याचा मार्ग सापडतो ना मागे येण्याचा मार्ग. मागे जाण्याचा मार्ग तर पूर्णपणे बंद होतो. अशावेळी आपण हतबल होऊन बसतो अगदी निवांत , त्यावेळी काय करावं याचा विचार करत , तो क्षण असा असतो की लोकांनी दिलेला छोटासा सल्लाही आपल्याला आपला अपमान वाटायला लागतो. आपण ठरवलेले मार्ग ,आपले ध्येय याच्यामध्ये आलेल्या त्या संघर्षात आपण शांत होऊन जातो. यामध्ये मग येते वेळ ती इतरांच्या मार्गांची, त्यांच्या सल्ल्याची. कधीही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की आपल्या आयुष्याचे निर्णय ज्यावेळी इतर लोक घेऊ लागतात तेव्हा आपण आपल्यावर विचार करण्याची वेळ आलेली असते. पण फक्त विचार करणं पुरेस नाही त्यावर काहीतरी मार्ग काढण्याची वेळ आलेली असते. शेवटीं आपण जिथे हतबल होऊन थांबतो, तेव्हा विचार करावा की, आपण दुसऱ्याच्या विचारांवर चालण्यासाठी हा अट्टाहास केला होता का?नाही ना?? पण याचा अर्थ असा नाही की कोणाचंच ऐकायचं नाही!! योग्य सल्ला घेणं महत्त्वाचं. कारण असे कित्येक लोक असतात जे योग्य सल्ला देतात, त्याचा विचार करणं सुद्धा महत्त्वाचं असतं. कारण रस्त्यावरचे पथदिवे आपल्याला मार्गावर योग्य चालायची दृष्टी देतात. मग ठरवा नवे मार्ग आपल्या विचारांचे आणि चालायला लागा. कुठे एका ठिकाणी थांबून राहू नका.

निर्णय हे नेहमी योग्यच असतात असे म्हणणे म्हणजे आपणच आपली चेष्टा करून घेतल्या सारखे आहे. निर्णय हे अवलंबून असतात परिस्थितीवर , जशी परिस्थिती तसे निर्णय हे घ्यावे लागतात. तेव्हा कधी निर्णय फसतात सुद्धा. अगदीच सांगायचं तर आपण शैक्षणिक शिक्षण पूर्ण केल्यावर आयुष्याचा घेतलेला निर्णय, हा अगदी काहीच लोकांवर यशस्वी होतो. तर कित्येक लोक जसं ठरवतात तसे होईलच अस नसतं. म्हणुच आपण आयुष्यात अगदीच एका निर्णयावर कधी अवलंबून राहावं हे चुकीचं आहे. आपण कित्येक मोठमोठ्या अभिनेता , उद्योगपती यांच्या मुलाखती ऐकतो. त्यातील काही सहज म्हणून जातात, मला अमुक अमुक व्हायच होत पण नशीब मला इकडे घेऊन आल. म्हणजे सांगायचा उद्देश हा एवढाच की प्रत्येक परिस्थितीतून योग्य निर्णय घेत आपण शिखरावर पोहचण गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही एक उंची गाठता तेव्हा तुम्ही काय होतात. तुम्हाला काय व्हायचं होत याच्याशी समाजाला काही देणं घेणं नसतं. तो काही लोकांच्या फक्त चर्चेचा विषय होऊन बसतो. पण असही नाही की एखाद्या गोष्टीत अपयशी झालो तर माघार घेऊन दुसऱ्या मार्गावर जावं, अस अजिबात नाही फक्त तिथे प्रयत्न करताना दुसऱ्या बाजूने आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग चालत राहावं एवढंच.

एक पायरी की दोन पायऱ्या हा जीवनाचा मार्ग चढण्याचे सूत्र असते. तुम्ही एक एक पायरी वर चढत गेलात तरी तिथेच पोहचणार आहात, आणि अगदी एका क्षणात मोठी उडी मारून पोहचलात तरी तिथेच पोहचणार. पण मग यामध्ये फरक तो काय ?? असा प्रश्न सर्वांना पडतो. फरक तो एवढाच की एक एक पायरी वर चढून गेलात तर त्या मिळालेल्या यशाची किंमत तुमच्या लेखी जास्त असेल. पण याचा अर्थ असा नाही अगदी काही क्षणात तिथे पोहचलेल्या लोकांना त्याची किंमत नाही. शेवटी आपण कुठे आहोत त्याची किंमत करणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक स्वभाव ठरू शकतो. यामध्ये ती प्रत्येक पायरी वर चढून आलेली ती व्यक्ती आपल्या ध्येयावर आपल्या मार्गावर जास्त स्पष्ट असते. पण त्यामानाने सहज क्षणात मिळालेलं यश हे माणसाला झेपेलच अस नाही. अगदी स्पष्ट सांगायचं तर माणसाने उगाच आयुष्यात शॉर्टकट वापरू नये. कारण यशाला शॉर्टकट नसतात. असतात ते फक्त प्रयत्न. थॉमस अल्वा एडिसन , निकोला टेस्ला या महान वैज्ञानिकांना कोणतंही यश अस एका क्षणात मिळालं नाहीये. त्यासाठी त्यांना कित्येक पायऱ्या चढून जाव लागलं.

चालताना आपल्याला भूक लागते, तहान लागते आपण क्षणभर शांत बसतो , खाऊन घेतो आणि पुन्हा पुढच्या वाटेवर चालायला लागतो. तेव्हा आपण गरज म्हणून आपल्या सोबत ठेवतो त्या वस्तू म्हणजे पाणी, खाण्यासाठी थोडे पदार्थ. तसच काहीस आपण यशाकडे वाटचाल करताना आपल्याला गरज असते ती आपल्याला चालवत ठेवणाऱ्या एखाद्या वस्तूची. जी कोणत्याही स्वरूपात असेल. जसे की एखाद्या गोष्टीची आलेली सनक, किंवा राग आपल्याला आपले ध्येय गाठण्यासाठी उद्युक्त करते. पण राग हा योग्य कारणाचा असावा. माझ्या माहितीतले एक सरकारी अधिकारी मला आठवतात , ते बदली करून आमच्या गावी आले होते, सरकारी कामामुळे माझी आणि त्यांची ओळख झाली, नंतर ते माझे चांगले मित्र झाले. सहजच एकदा बोलता बोलता ते मला म्हणाले, मी सरकारी अधिकारी का झालो माहितेय तुला? , या प्रश्नाच्या उत्तराकडे मी कुतूहलाने पाहू लागलो. एवढा मोठा अधिकारी झालो कारण , मी माझ्या मामाकडे राहत होतो शिक्षणासाठी , आणि ते मला माझ्या शिक्षणावरून नेहमी बोलत असायचे, मी काही करू शकणार नाही असं त्यांना वाटायचं आणि ते वाटणं माझ्यासाठी प्रेरणा होत. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. जेव्हा मी अधिकारी झालो, काहीतरी बनलो, तेव्हा त्यांच्या नजरेत माझी प्रतिमा सुधारली, माझी जिद्द मी योग्य जागी खर्च केली.

शेवटी आपण कसे जगलो हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. तुझ्यामुळे अस !! तुझ्यामुळे तस् या गोष्टींना काही महत्व नसतं. लहानपणी जेव्हा आपण पहिल पाऊल टाकतो, तिथून पुढे घडणाऱ्या सर्व गोष्टी या आपण निसर्गाला कसे उत्तर देतो यावर अवलंबून असतं. ज्या समाजात आपण जन्म घेतो त्याचे संस्कार आपण घेतो, जगण्याची दिशा मात्र आपले विचार ठरवतात. तुम्हाला शिक्षणासाठी शाळेत जायला मिळालं, पण तुम्ही उच्यशिक्षित होणार की नाही हे सर्वस्वी तुमच्या विचारांवर , जिद्दिवर , कष्टावर अवलंबून आहे. कारण या जगात शालेय शिक्षण न झालेल्या कित्येक व्यक्ती आयुष्यात खूप यशस्वी झालेल्या आहेत. म्हणून हेच मिळालं, ते नाही हे रडणं म्हणजे स्वतःची फसवणूक केल्यासारखं आहे.

तेव्हा उठा !! आपल्या आयुष्याचे निर्णय कोणी दुसरा घेण्या अगोदर आपल्या मार्गावर मार्गस्थ व्हा !! मार्ग दाखवणारे व्हा !! कोणाच्या सांगितलेल्या मार्गावर चालणारे होऊ नका !! लढवय्ये व्हा!! मध्येच हत्यार टाकून रडणारे नको. कारण या काही वर्षात आयुष्यात पराभूत होऊन आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आत्महत्या हा विचार करणाऱ्या लोकांना एकच सांगावेसे वाटते, आजची परिस्थिती उद्या तशीच असेल, जेव्हा तुम्ही शांत व्हाल, पण लढाई कराल तर नक्कीच परिस्थीती बदलेल. शेवटी जिंकणं ही सवय झाली पाहिजे. आणि सवय ही सतत कार्य केल्यानेच होते.

✍️© योगेश खजानदार

Sponsored Links

SHARE

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
  • Click to share on Telegram (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Tumblr (Opens in new window)
  • Click to share on Pinterest (Opens in new window)
  • Click to share on LinkedIn (Opens in new window)
  • Click to share on Skype (Opens in new window)
Tags aatmahatya तुमच्या आयुष्याचे निर्णय कोण घेत ? तुम्ही की दुसरं कोण ? best Marathi Motivational video lekh marathi lekh motivational marathi essay motivational marathi kavita Motivational poem MPSC UPSC

READ MORE

भेटून त्या क्षणांना || मराठी कवितेच्या जगात || Marathi Poems ||
भेटून त्या क्षणांना || मराठी कवितेच्या जगात || Marathi Poems ||
gold buddha figurine in gold and red floral dress
गणपतीची पट्टी || Ganapati Utsav ||
brown framed eyeglasses on a calendar
वाढदिवस || तिथी की तारीख || Marathi ||
impossible text
एक जिद्द म्हणजे तरी काय ??|| Motivational quotes|| Must Read
Read Previous Story दिनविशेष २२ जुलै || Dinvishesh 22 July ||
Read Next Story दिनविशेष २३ जुलै || Dinvishesh 23 July ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

TOP POEMS

photo of elderly woman wearing saree

खंत || KHANT MARATHI POEM ||

तो दरवाजा उघडला होता तीच्या डोळ्यात पाणी होते आईची खंत काय आहे ते मन आज बोलतं होते नकोस सोडुन जावु मजला मी काय तुला मागितले होते एक तु,तुझे प्रेम बाकी काय हवे होते
a couple holding hands

त्या वाटेवरती…!! || TYA VATEVARATI ||

मी पुन्हा त्या वाटेवरूनी तुला पहात जावे किती ते नजारे आणि किती ते बहाणे कधी उगाच त्या वाटेवरती घुटमळत राहता कोणती ही ओढ मनाची कोणते हे तराणे
burning tree

मन स्मशान || SMASHAN || MARATHI KAVITA ||

जळाव ते शरीर दुखाच्या आगीत मरणाची सुद्धा नसावी भीती पिशाच्च बनावं स्वार्थी दुनियेत माणुस म्हणुन नसावी सक्ती पडावा विसर त्या विधात्याला
woman standing nearcherry blossom trees

चालण्यास तू सज्ज हो || Marathi Motivational Poem ||

शोधता मिळे तो मार्ग !! चालण्यास तू सज्ज हो!! नकोच किंतू आणि परंतु !! लढण्यास तू सज्ज हो !! बोलेल वाट परतून जाण्या !! ढाल हाती सज्ज हो !! होतील वार कित्येक तुझ्यावर !! निडर होण्या सज्ज हो !! बरसतील त्या सरी अनावर !! भिजुनी जाण्या सज्ज हो !! प्रखर त्या सुर्यासवे मग !! तळपण्यास तू सज्ज हो!!
woman covering her face

हळूवार तू लाजता || Haluwar Tu Lajata || Marathi Poems ||

हलके ते हात, हातात आज घेणे!! नकळत तो स्पर्श, मनास त्या बोलणे !! क्षणात या सहज, क्षण विरून जाणे !! तुझ बोलता नकळत, बहरून आज जाणे !!
man holding a megaphone

आवाज || AAWAZ MARATHI KAVITA ||

आवाज आता दबुन गेला शक्ती आता संपुन गेली वाईटाच्या मार्गावर अखेर माणुसकी ही मरुन गेली कोणी कोणाला बोलायचं नाही अत्याचाराशी लढायचं नाही निर्दोष लोकं फुकट मेली गुन्हेगार इथे सुटुन गेली

TOP STORIES

bride and groom standing next to each other

नकळत || कथा भाग ३ || NAKALAT || LOVE STORY ||

I'm really sorry ..!! तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे !! प्लीज !! " मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.
वर्तुळ || कथा भाग ३ || मराठी कथा ||

वर्तुळ || कथा भाग ३ || मराठी कथा ||

बाबा ऑफिसला गेले आणि आकाश आपल्या खोलीतून बाहेर आला. लवकर लवकर सगळं आवरू लागला. त्याला कधी एकदा आवरून पुन्हा मोबाईल हातात घेतोय अस झाल होत. त्याची ही लगबग आईच्या नजरेतून सुटली नाही. ती त्याला म्हणाली , "आकाश एवढी काय घाई आहे !! मोबाईल कुठे जाणार आहे का ?? का कोणी विकून टाकणार आहे ??" "आई !! काहीही काय ? " " मग जरा सावकाश !! जेवण सुद्धा नीट करत नाहीये तू !!"
brown wooden house surrounded with trees and plants

स्वप्न || कथा भाग २ || MARATHI STORIES ||

घराचा दिवा पोरगं जणू घराची वात पोरगी असते घरात सारे शिकले तर घराची प्रगती होत असते
close up photo of skull

स्मशान || कथा भाग ३ || Gavakadchya Katha ||

सदा शिवाच्या मागे मागे चालू लागला. तसेतसे ते कंदील आणखी जवळ येऊ लागले. शिवा आणि सदा थोडे जवळ येताच त्या दिशेने बाईच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. त्या आवाजाने शिवा गोंधळून गेला. "आबा !! बाईंचा आवाज!!"सदा कुतूहलाने म्हणू लागला.
mysterious shadow behind dark backdrop

विरोध || शेवट भाग || Marathi katha ||

प्रिती तुला माझ्याकडुन घटस्फोट हवाय !! हीच माझ्या प्रेमाची किँमत !! नाही प्रिती हे होणार नाही !! तुला मी माझ्यापासून दूर जावू देणार नाही !! बस्स !! आजपर्यंत खूप ऐकून घेतलं तुझ प्रिती !! दहा वर्ष छळलस मला त्या अनिकेतच्या आठवणीत !! तुला तुझ प्रेम मिळालं !! तू त्याच्याकडे निघून जातेय !! खरतर एका परपुरूषाशी तू माझ्या समोर प्रेमाची कबुली देत आहेस !! आणि मी फक्त बघत बसलो! !! माझ्यावर खोट प्रेम केलंस तू !! नाटक केलंस!! त्या अनिकेतला फसवलस,! नाही प्रिती इतक्या सहज मी तुला माझ्यापासून वेगळं होऊ देणार नाही !! तुला आता माझ्यापासून वेगळं एकच गोष्ट करू शकेल आणि तो म्हणजे मृत्यु
child and woman standing near water

आई || कथा भाग ११ || मराठी कथा || Story ||

दुसरा दिवस सर्व आवरा आवर करण्यातच गेला. बाबा आणि समीर त्या तिघींना पुण्याला सोडण्यासाठी जायचं ठरलं. जायच्या दिवशीही सगळे आवरा आवर करत होते. समीर आणि शीतल मध्येच काही राहील तर नाहीना याची शहानिशा करत होते. बाबा त्रिशाला आपल्या कडेवर घेऊन सर्व घरात फिरत होते. आज त्रिशा पुण्याला जाणार या विचाराने त्यांच्या मनात घालमेल होत होती. एका आजोबाला आपल्या नातीपासून दूर राहण्याच दुःख काय असतं जणू ते व्यक्तही करू शकत नव्हते. घरभर फिरून खेळत असताना समोर दरवाजा वाजतो, बाबा दरवाजा उघडतात. समोर एक अनोळखी व्यक्ती पाहून बाबा त्याला विचारतात,

Contact Us

khajandar_yogesh@yahoo.in
+919923777633

Services

  • Home
  • About Us
  • FAQ

Quick Links

  • Privacy Policy
  • Categories
  • Copyrights Policy
  • RSS Feed

FeedBack Message

  • EMail Us
  • WhatsApp

Social

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
  • Youtube
  • Pinterest

Informaion

  • Terms
  • Photogallery
  • Blog
  • Community

Navigation

  • Menu
  • Pages
  • HTML SITEMAP

NewsLetter

Subscribe to our newsletter!

CopyRights©2022 All Rights Reserved || मराठी कथाकविता.com

Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy