

गणतंत्र दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा! २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या भारताचे संविधान लागू झाले. तो दिवस साऱ्या भारतवर्षात प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता , लोकांची सत्ता म्हणून साजरा केला जातो. कित्येक राज्य, कित्येक धर्म , कित्येक जाती एक झाल्या, त्या या तिरंग्या समोर , विविधतेत एकता म्हणतात ते याचसाठी. अशा या भारत देशाचा ध्वज आकाशात डौलात फडकताना एक अभिमान वाटतो त्या वाऱ्यासही , प्रत्येकवेळी नव्याने चैतन्य पसरते त्या आकाशातही, गंध हरवुनी जाते ते फुलंही.. आणि एकजीव होऊन जाते सारे तो राष्ट्रध्वज येता समोरी, अशा या भारतमातेला कितीही वेळा नमन केले तरी पुन्हा पुन्हा नतमस्तक व्हावे वाटते …
वाऱ्यास अभिमान एवढाच काही!! डौलात फडकत्या तिरंग्यास पाही!! क्षणोक्षणी त्यास मग स्पर्शून जाई!! आपुल्यास साऱ्या गुणगान गाई!! आभाळी एक तेव्हा नवचैतन्य येऊनी!! साऱ्या आसमंतात भरून जाऊनी!! त्या तिरंग्यास जेव्हा कवेत घेऊनी!! आकाश होते ठेंगणे त्याहुनही!! उधळले फुल जाणले पाकळ्यांनी!! गंध सारे दरवळे चारी दिशांनी!! काही थांबले काही रेंगाळूनी!! तिरंग्यात जणू हरवले गंधाळूनी!! शब्द भारावले ओठावर येवूनी!! गर्व होता उर येई भरुनी!! तिरंग्यास कित्येक वंदन करुनी!! या भारतमातेस नतमस्तक होऊनी!! तेव्हा, आठवणीत यावे कित्येक क्षणही!! शहीद जवान आणि त्यांचे आयुष्यही!! मातीत घडले कित्येक महापुरुषही!! तेच खरे या तिरंग्याची शानही!! वाऱ्यास अभिमान एवढाच काही!! डौलात फडकत्या तिरंग्यास पाही!! ✍️©योगेश खजानदार
READ MORE
"चार पानांचं आयुष्य हे, मनसोक्त जगायचं !! प्रत्येक श्वास घेताना , नव काही लिहायचं !! कुठे बेफाम हसायचं , कूठे मनमोकळ रडायचं !! प्रत्येकवेळी जगताना, हळूच जपून ठेवायचं !!
डोळे सांगतात नेहमी!! गुपिते ती मनाची ?? ओल्या पापण्या!! आणि गोष्ट ती अश्रूंची?? एकटेच चालत रहावे!! सोबत ती कोणाची ?? जड पावले!! आणि ओळख ती सावल्यांची??
जागी झाली नदी, जागे ते घरही होत आहे !! अजूनही झोपल्या त्या, अंगणास जाग येत आहे !! पसरल्या त्या धुक्यात, स्वप्न धूसर होत आहे!! पानावर दवबिंदू होऊन, मला पुन्हा भेटत आहे !!!
पैसा बोले , पैसा चाले ,सार इथे खोट हाय !! श्रीमंताचे कपडे सुंदर, गरिबाचे मळके पाय !! धाव तू , थांब तू , पण जायचं तुला कुठे हाय ?? श्रीमंताची शिवी गोड,…
ओंजळीत घ्यावे , परी निसटून जात आहे !! कदाचित नकळत , मनातले ते सांगत आहे!!
शोधावी ती माणसं जी स्वप्नांशी झुंजत असतात झोपलेल्या उगाच पाहत वेळ वाया घालवू नये
विठू चरणी आज ,दुमदुमली पंढरी साद एक होता, भरली ती पंढरी एक ध्यास , एक ओढ , चंद्रभागेच्या त्या तीरी विठ्ठल विठ्ठल नामात सारी, तल्लीन ही पंढरी
'मनाचं कपाट अगदी आठवणींनी भरून गेलं !! त्यात एवढ्या आठवणी झाल्या की, कधी कोणती आठवण भेट देईल सांगता येत नाही..!!या आठवणी कधी नकळत मनात समावल्या, तर कधी आवर्जून आठवणीत ठेवल्या ..!!
एक पुतळा फुटला !! आणि अचानक मनातलं बोलला …! निषेध ..!!! पण कसला ?? पुतळा फुटला म्हणून !! अरे !! पण तो पुतळा जातीपातीत विभागला कोणी त्याला शोधा !! नाटकी हार !!…
एक बहिण म्हणुन आता मला एवढंच सांगायचं आहे रक्षण करणाऱ्या माझा भावाला थोडसं बोलायचं आहे
जय हिंद..🙏😊
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..🙏😊
धन्यवाद ..🙏🙏😊
धन्यवाद ..😊🙏
🇮🇳
प्रजासतताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳
Class… 👌👌👌
योगेश खजानदार, शब्दांचा मोठा खजाना आहे तुमच्याकडे…!