Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » मराठी लेख

किल्ला || KILLA MARATHI ESSAY ||

Category मराठी लेख
किल्ला || KILLA MARATHI ESSAY ||
Share This:

दिवाळी जवळ आली की आमची धावपळ सुरुच व्हायची. दगड, विटा, आणि माती या सर्व गोष्टींची जमवाजमव व्हायची. मी आणि भैया आमच्या दोघांची नुसती धावपळ असायची. शेजारचे दोन चार मित्र जमायचे आणि सुरु व्हायची किल्ले बांधणीची सुरुवात. मधुनच आईची एक हाक ऐकु यायची ‘जास्त मातीत खेळु नका रे !!’ आणि त्याला आम्ही ‘हो आई नाही खेळत!!’ म्हणुन उत्तर द्यायची. मग सकाळी जे सुरुवात करायची किल्ला बांधण्याची ती थेट 2 3 दिवस चालायची.

सुरुवात व्हायची ती माती घेऊन येण्या पासुन. घरातील एक जुनाट पोत घ्यायच, आई नको म्हणत असताना ही आणायचं. ‘ही माती चांगली आहे.. घ्या रे .! ‘भैया ने सांगायच कारण आमचा मुखीया तोच असायचा. मग शेजारच्या मित्रानी आणि मी भराभर माती घ्यायची आणि घरा जवळ आणायची. पुन्हा सुरुवात ती मोठा दगड हुडकून आणायची. तो कुठे भेटलाच की कसा आणायचा ही एक मज्जाच असायची. कित्येक वेळा बोट सापडन, कापण , खरचटन असले प्रकार सर्रास व्हायचे.

सगळ्या आवश्यक गोष्टी एकत्र केल्या नंतर भैया मातीत पाणी ओतुन त्याचा व्यवस्थित चिखल करुन किल्ला बांधणीचं उदघाटन करायचा. सर्वाच्या मताने किल्ला कसा झाला पाहिजे याची चर्चा सुरू व्हायची. एमताने नंतर शेवटचं ठरायच आणि मग सगळेच किल्ला बांधण्यात व्यस्त होऊन जायचे. एकदा सुरुवात झाली की किल्ला बांधनीसाठी अजुन आमचे मित्र कधी जमायचे कळायचंही नाही दोनाचे पाच व्हायचे. शेवटचा हात मार योग्या त्या बुरुजाच्या बाजुने!! अस भैया म्हटला की अखेर किल्ला बांधणीच काम पुर्ण झालं अस समजायचं.

आता राहता राहिला प्रश्न सजावटीचा तर मग किराणा दुकानातुन लाल कलर त्याला काव म्हणायचे तो आणायचा आणि चुना. मग तटबंदीला मस्त लाल कलर लावुन चुण्याची सजावट म्हणुन उपयोग व्हायचा. किल्ला सुंदर आणि आकर्षक दिसावा म्हणुन आळीव आणि काही धान्य टाकायचं. दोन तीन दिवसात ते उगवुन यायचं. मग रोज त्याला वेळेवर पाणी घालायचं काम माझ्याकडे असायचं.

किल्ला पुर्ण झाला की स्वच्छ हात पाय धुवुन थेट स्वयंपाक घरात जायचं. दिवसभर केलेल्या मेहनती मुळे प्रचंड भुक लागायची. आई तयारच असायची प्लेट भरुन फराळ देण्यासाठी. मी , भैया आणि आमचे मित्रमंडळी मस्त ताव मारायचो त्यावर. करंजी , चिवडा , चकल्या किती पहावं तेवढे फराळाचे प्रकार खाऊन पुन्हा किल्ल्या जवळ सगळे यायचो. आता किल्लावर शिवाजी महाराजांची मुर्ती आणि मावळे ठेवले जायचे. संध्याकाळी किल्लावर दिवे लावुन त्यासमोर आई रांगोळी काढायची. अशी एकूण सजावट झाली की किल्लाकडे नुसत पाहातच राहवस वाटायचं. त्या दिव्याच्या प्रकाशात किल्ला आणि शिवरायांची मुर्ती अगदी जिवंत वाटायची. साक्षात शिवरायच आपल्या घरी आले आहेत अस वाटायचं.

अशी सगळी धमाल दिवाळीत व्हायची किल्ला , फटाके आणि फराळ यांनी नुसती भरुन जायची. तो आनंद तो उत्साह वेगळाच होता. लहानपण परतुन यावं म्हणतात ते यासाठीच अस मला वाटतं. इथे ना कोणत्या गोष्टींची चिंता होती ना ओढ. होतं ते फक्त छोट्या छोट्या गोष्टीत आनंदाच जगणं.. अगदी क्षणाक्षणात.. प्रत्येक मनातं… आज जुने फोटो पहाताना ते मनात पुन्हा जगल्या सारखं वाटलं..

© योगेश खजानदार

Tags किल्ला Diwali diwalitala killa kilaa aani diwalichya aathavani marathi lekhkilla

RECENTLY ADDED

दुपारचं उन्ह || मराठी लेख || Marathi ||
दुपारचं उन्ह || मराठी लेख || Marathi ||
gold buddha figurine in gold and red floral dress
गणपतीची पट्टी || Ganapati Utsav ||
woman in black long sleeved shirt
तुमच्या आयुष्याचे निर्णय कोण घेत ? तुम्ही की दुसरं कोण ? || Marathi Lekh ||
brown framed eyeglasses on a calendar
वाढदिवस || तिथी की तारीख || Marathi ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

TOP POST’S

श्री कालीमाता

श्री कालीमाता आरती || Aarati || Devotional ||

मंगल की सेवा सुन मेरी देवा, हाथ जोड तेरे द्वार खडे। पान सुपारी ध्वजा नारियल ले ज्वाला तेरी भेट करे. सुन जगदम्बा न कर विलम्बा, संतन के भडांर भरे। सन्तन प्रतिपाली सदा खुशहाली, जय काली कल्याण करे ।।
low angle photo of brown temple

श्रीसूर्यकवचस्तोत्रम् || ShriSuryakavachastotram || DEVOTIONAL ||

श्री गणेशाय नमः I याज्ञवल्क्य उवाच I श्रुणुष्व मुनिशार्दूल सूर्यस्य कवचं शुभम् I शरीरारोग्यदं दिव्यं सर्व सौभाग्यदायकम् II १ II दैदिप्यमानं मुकुटं स्फ़ुरन्मकरकुण्डलम् I ध्यात्वा सहस्रकिरणं स्तोत्रमेतदुदीरयेत् II २ II
Dinvishesh

दिनविशेष ७ मे || Dinvishesh 7 May ||

१. मुंबई ते टोकियो विमानसेवा एअर इंडियाने सुरू केली. (१९५५) २. स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाईटचे पेटंट केले. (१८६७) ३. लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. (१९९०) ४. इराकने तेहरानच्या तेल साठ्यांवर बॉम्ब हल्ले केले. (१९८६) ५. मुंबईमध्ये विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली. (१९०७)
brown wooden cubes

मी पणा || MARATHI KAVITA ||

माझं माझं करताना आयुष्य हे असचं जातं पैसा कमावत शेवटी नातं ही विसरुन जातं राहतं काय अखेर राख ही वाहुन जातं स्मशानात गर्व ही आगीत जळून जातं
wistful black woman hugging stressed husband in bathroom

नातं माझं || NAAT MAJH || MARATHI BLOG ||

नातं एक असच होतं कधी दुख कधी सुख होतं सुखाच तिथे घर होतं आणि मनात माझं प्रेम होतं कधी माफी कधी रुसन होतं क्षणात सारं जग होतं दुख कुठे पसार होतं आनंदाने नातं राहतं होतं

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest